शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

त्र्यंबकेश्वरी हॉटेलचे शिळे अन्न गटारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:26 IST

चालकांचा प्रताप : दुर्गंधीमुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी

ठळक मुद्देदरम्यान हॉटेल मालकांनी अन्नपदार्थ गटारात टाकण्याऐवजी पालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाच्या गाडीत टाकावेत, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे

त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.आंबेडकर चौकात शुक्र वारी (दि.८) गटारात हॉटेलचालकांकडून शिळे अन्न टाकण्यात आल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे त्र्यंबकेश्वरी आलेल्या भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हॉटेलसमोरील व बाजुच्या गटारी भरल्याने त्या साफ करण्यासाठी कर्मचारी पाठविले असता यावेळी गटारीवरचे ढापे काढल्यानंतर संपुर्ण आंबेडकर चौकात भयंकर दुर्गंधी सुटली. या दुर्गंधीमुळे परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागले. चौकशीअंती, सदर गटारींमध्ये आसपासच्या हॉटेल चालकांकडून शिळे अन्न पदार्थ टाकले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल चालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. बाजुलाच त्र्यंबक नगरपालिका कार्यालय आहे. यावेळी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक एच. आर. ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि एका हॉटेल चालकाला कार्यालयात पाचारण करून समज दिली तर इतर हॉटेल चालकांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे.दरम्यान हॉटेल मालकांनी अन्नपदार्थ गटारात टाकण्याऐवजी पालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाच्या गाडीत टाकावेत, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक