शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

त्र्यंबकेश्वरला पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:49 IST

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. एकट्या त्र्यंबकेश्वर शहराला नगर परिषदेतर्फे तीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असतो. तथापि या तीनही जलाशयांचा साठा आटल्याने त्र्यंबककवासीयांना दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली आहे. शहराला यावर्षी उशिराने पाणीटंचाई सुरू झाली.

त्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली आहे. एकट्या त्र्यंबकेश्वर शहराला नगर परिषदेतर्फे तीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असतो. तथापि या तीनही जलाशयांचा साठा आटल्याने त्र्यंबककवासीयांना दिवसाआड पाणी पिण्याची वेळ आली आहे.शहराला यावर्षी उशिराने पाणीटंचाई सुरू झाली. सन २०१९ मध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने यावर्षी टंचाई उशिराने सुरू झाली. अर्थात त्र्यंबकेश्वर शहराला टंचाई परिस्थिती भासण्याची तशी काही गरज नाही. त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यास ३/४ वर्षांचा अवधी राहिल्यास सिंहस्थ नियोजनाची कामे सुरू केली जातात. त्यात सर्व प्रथम पाण्याला प्राधान्य दिले जाते.गेल्या ३६ वर्षांत तीन वेळा त्र्यंबकच्या पाणीपुरवठा योजना शासनातर्फे तयार केल्या गेल्या. १९९०-९१ साली अंबोली लघुपाटबंधारे धरणातून त्र्यंबकेश्वरला थेट पाइपलाइनद्वारे ११ किलोमीटर अंतरावरून योजना तयार करण्यात आली. सन २००३-०४ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अंबोली सुधारित योजना अंमलात आली. यात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलवाहिनी करत योजना तयार करण्यात आली होती. सन २०१५-१६ साली गौतमी गोदावरी प्रकल्प अंमलात आणला गेला. गौतमी गोदा धरणातून त्र्यंबकेश्वरसाठी फक्त १० टक्के पाणी राखीव आहे. बेझे धरण मुळातच मराठवाडा विभागासाठी असल्याने ऐन उन्हाळ्यात व त्यापूर्वीदेखील मराठवाडा विभागाकडे विसर्ग केला जातो. साहजिकच बेझे धरणात त्र्यंबकसाठी आरक्षित असलेले १० टक्के पाणी मिळणे अशक्य असते.----------------

 त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मालकीचे अहिल्या धरण, अंबोली धरण व बेझे धरण अशा तीनही धरणात पाण्याचा साठा आटल्याने त्र्यंबकेश्वरसाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याचा पर्याय पालिकेने जाहीर केला आहे. यात दोन झोनमध्ये अवघे ४० मिनिटे पाणी सोडले जाणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक