शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

त्र्यंबकेश्वरला उलट्या-जुलाबाची साथ

By admin | Updated: December 3, 2015 22:01 IST

दखल : उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल

त्र्यंबकेश्वर : गेल्या ५/६ दिवसांपासून त्र्यंबकेश्वर शहरात उलट्या व जुलाबाची साथ पसरली असून, येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल होत आहेत. सिंहस्थ संपून जवळपास तीन महिने होत आले आहेत. तथापि भाविकांना व शहरवासीयांना कोणताही आजाराचा फटका बसला नाही. सिंहस्थातील तीनही पर्वण्या सुखरूप पार पडल्या.शहरात गेल्या ५ ते ६ दिवसांपासून पोटात मुरडा मारून येणे, मळमळ होऊन उलट्या होेणे, जुलाब होणे असे आजार घरोघरी पसरले आहे.पालिकेने पाण्याच्या जलशयाचीही पाहणी केली. पाण्यात काही जनावरे मरून पडली आहे किंवा काय अशा सर्व शक्यता पडताळूृन पाहिल्या. याबाबत आम्ही पुरेपूर काळजी घेत असल्याचे मुख्याधिकारी नागरे यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयातदेखील रुग्ण दाखल होऊन उपचार करून जात आहेत. गावातील खासगी रुग्णालयातदेखील नागरिक उपचार करून जात आहेत. बुधवारी रुग्णांचे प्रमाण जास्त होते, आज थोडे कमी असल्याचे डॉ. पंकज बोरसे यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयानेदेखील घरोघरी सर्वेक्षण करून बाधीत रुग्णांना गोळ्या, औषधे देणे सुरू केले आहे, तर गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची तजवीज केली आहे, अशी माहिती डॉ. अशोक माने, डॉ. भागवत लोंढे व डॉ. विठ्ठल काळे यांनी दिली. (वार्ताहर)