शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

त्र्यंबकेश्वर तालुका हगणदारीमुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:06 IST

शिरपेचात मानाचा तुरा : ६८६७ शौचालये पूर्ण त्र्यंबकेश्वर : तालुकासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे शासनाकडून आता विविध प्रकल्पांसाठी निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण शिरपेचात मानाचा तुरा : ६८६७ शौचालये पूर्ण

शिरपेचात मानाचा तुरा : ६८६७ शौचालये पूर्ण

त्र्यंबकेश्वर : तालुकासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे शासनाकडून आता विविध प्रकल्पांसाठी निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.गेल्या वर्षापासून लोकप्रतिनिधी, प्रशासन, पदाधिकाºयांनी केलेल्या परिश्रमाला यश आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यात ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार या आर्थिक वर्षात तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक शौचालय बांधून त्याचा वापर करत असल्याने तालुका आता पूर्णपणे हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा आज पंचायत समिती सभापती ज्योती राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सभापती ज्योती राऊत, उपसभापती रवींद्र भोये, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, माजी सभापती देवराम भस्मा, मधुकर झोले आदी उपस्थित होते.उपसभापती रवींद्र भोये यांनी, तालुका हगणदारीमुक्त झाला आहे. यासाठी प्रशासनासह गावकºयांनी चांगले सहकार्य केले. यात प्रामुख्याने गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांचा मोलाचा सहभाग आहे. तसेच तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, तलाठी, शिक्षक आदींसह लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत पदाधकारी आदींच्या सहकार्यामुळेच ८४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील कुटुंब हगणदारीमुक्त होऊ शकली.यापुढेही तालुका हगणदारीमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकाºयांनी केले. तालुक्यात प्रबोधन, जनजागृती, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय उभारणीला चालना तसेच उघ्यावर शौचास बसण्यास बंदी करण्यात आलीआहे. स्वच्छतेमध्ये तालुक्याचा प्रथम क्र मांक आलाा असून, तो कायम राहावा असा आमचा प्रयत्न राहणार आहे. गावाने निर्मलग्राम होण्यासाठी ग्रामपंचायतींना मोठे अधिकार असून, गावात सरपंच, सदस्यांनी विकासाची वाट धरावी. तालुका हगणदारीमुक्तजाहीर झाला असला तरी येथून पुढे तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने स्वच्छता पाळावी व स्वच्छतेमध्ये गावाचा प्रथम क्रमांककायम ठेवावा.- मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी.