शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

त्र्यंबकेश्वर तालुका हगणदारीमुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:06 IST

शिरपेचात मानाचा तुरा : ६८६७ शौचालये पूर्ण त्र्यंबकेश्वर : तालुकासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे शासनाकडून आता विविध प्रकल्पांसाठी निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण शिरपेचात मानाचा तुरा : ६८६७ शौचालये पूर्ण

शिरपेचात मानाचा तुरा : ६८६७ शौचालये पूर्ण

त्र्यंबकेश्वर : तालुकासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे शासनाकडून आता विविध प्रकल्पांसाठी निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.गेल्या वर्षापासून लोकप्रतिनिधी, प्रशासन, पदाधिकाºयांनी केलेल्या परिश्रमाला यश आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यात ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार या आर्थिक वर्षात तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक शौचालय बांधून त्याचा वापर करत असल्याने तालुका आता पूर्णपणे हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा आज पंचायत समिती सभापती ज्योती राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सभापती ज्योती राऊत, उपसभापती रवींद्र भोये, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, माजी सभापती देवराम भस्मा, मधुकर झोले आदी उपस्थित होते.उपसभापती रवींद्र भोये यांनी, तालुका हगणदारीमुक्त झाला आहे. यासाठी प्रशासनासह गावकºयांनी चांगले सहकार्य केले. यात प्रामुख्याने गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांचा मोलाचा सहभाग आहे. तसेच तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, तलाठी, शिक्षक आदींसह लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत पदाधकारी आदींच्या सहकार्यामुळेच ८४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील कुटुंब हगणदारीमुक्त होऊ शकली.यापुढेही तालुका हगणदारीमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकाºयांनी केले. तालुक्यात प्रबोधन, जनजागृती, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय उभारणीला चालना तसेच उघ्यावर शौचास बसण्यास बंदी करण्यात आलीआहे. स्वच्छतेमध्ये तालुक्याचा प्रथम क्र मांक आलाा असून, तो कायम राहावा असा आमचा प्रयत्न राहणार आहे. गावाने निर्मलग्राम होण्यासाठी ग्रामपंचायतींना मोठे अधिकार असून, गावात सरपंच, सदस्यांनी विकासाची वाट धरावी. तालुका हगणदारीमुक्तजाहीर झाला असला तरी येथून पुढे तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने स्वच्छता पाळावी व स्वच्छतेमध्ये गावाचा प्रथम क्रमांककायम ठेवावा.- मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी.