शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

त्र्यंबकेश्वरचा नदीकाठ पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 18:10 IST

तिसऱ्यांदा पूर : संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

ठळक मुद्देआषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जलपुजन करण्याचा मानस

त्र्यंबकेश्वर : शहर व परिसरात संततधार पावसामुळे पुन्हा एकदा शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. गोदावरी नदीसह निलगंगा व म्हातार ओहळाला पुर आल्याने नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसले. बुधवारी रात्रभर पावसाचा जोर सुरू होता.शहरात आतापर्यंत तिसऱ्यांदा पुर आला आहे. गेल्या रविवारी (दि.७) आलेल्या पुरामुळे शहर जलमय झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. हा पूर ओसरत नाही तोच बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा शहरातील काही भाग पाण्यात गेला. तेली गल्लीत निलगंगेचे पाणी नेहमीच घुसत असते. त्यामुळे संपुर्ण तेलीगल्लीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घरांना कायम पुराच्या पाण्याशी सामना करावा लागतो. संपुर्ण मेनरोड वरील निवासी घरे व दुकाने आदिंचा तळमजला पाण्यात जात असतो. दरम्यान, बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरात काही भागात पुन्हा एकदा पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नदीकाठ परिसरातील अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर ओसरायला सुरूवात झाली. सोमवारी (दि.८) सकाळी आठ वाजेपर्यंत अंबोली धरण जवळपास ९० टक्के भरले होते. बेझे वगळता अंबोली-अहल्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जलपुजन करण्याचा मानस नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी बोलुन दाखविला.

टॅग्स :Nashikनाशिक