शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

त्र्यंबकेश्वर, पेठला पुन्हा मुसळधार

By admin | Updated: August 6, 2016 22:24 IST

वेळुंजेत १५३ मिलिमीटरची विक्रमी नोंद : अनेक ठिकाणी रोपे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल

 त्र्यंबकेश्वर : परिसरात शुक्रवारी रात्री अवघ्या १० तासांत १२ किमी अंतरावरील असलेल्या वेळुंजे येथे १५३ मिमी विक्रमी, तर त्र्यंबकला ९४ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे हरसूल परिसराचा काही काळ संपर्क तुटून दळणवळण ठप्प झाले.गेल्या आठवडाभरापासून त्र्यंबकेश्वरला पावसाचे सातत्य असून, सलग बरसत आहे. ३० जुलैपासून पाऊस सुरू आहे तो आजपर्यंत सुरूच आहे. त्यामुळे पावसाची सरासरी अव्याहतपणे वाढत आहे. मागील वर्षी चार महिन्याच्या पावसाळ्यात थेट आॅक्टोबरपर्यंत पावसाची नोंद घेतली असता १०७१ मिमी. सरासरी होती. तत्पूर्वी मागील पाच वर्षांची पावसाची आकडेवारी पाहता सन २०११ मध्ये १६५२ मिमी, २०१२-१५२०, २०१३-२१४२, २०१४-१७७४, तर मागील वर्षी अवघा १०७१ मिमी पावसाची सरासरी दिली होती. यावर्षी मात्र जून, जुलै तसेच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच १५०८ मिमी. पाऊस बरसला आहे. एवढा जोरदार पाऊस होऊनही तालुक्यात मात्र ४-५ जनावरे वाहून गेल्याशिवाय कुठले नुकसान झालेले नाही. त्र्यंंबकला तर कधी नव्हे तो २ आॅगस्टला पाऊस पडून सर्व गाव जलमय झाले होते. एवढेच नव्हे तर गोदामाई प्रत्यक्ष दारासमोर तर काहींच्या घरात प्रवेश करून गेली.त्र्यंबकला धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांच्या धार्मिक विधीचे पिंडदान दारातूनच करावे लागले. दरम्यान, पावसाचे आगमन जूनमध्ये झाल्यावर बळीराजाने अत्यंत समाधानाने पेरणीची कामे अगदी वेळेवर पूर्ण करून घेतली. सर्वांनी पेरणी करून रोपे येण्याची वाट पाहत असताना वरुणराजा वेळेवर बरसू लागला. आवणीदेखील झाली. काहींची रोपे छोटी होती आणि एकाएकी ३० जुलैपासून जो पाऊस सुरू झाला तो आजपर्यंत सुरूच आहे. अनेकांची रोपे सडली तर काहींची संपूर्ण शेतीच वाहून गेली. परिणामी राजकीय पक्षांनी, शेतकरीवर्ग आदिंनी पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे. आॅगस्टमध्ये मात्र पावसाचे सातत्य कायम आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर केलेली नवीन कामामधील कासारबारीचा रस्ता खचला असून, सुमारे ७-८ फूट रस्त्यावर खड्डा पडला आहे. गणपतबारी, पहिणे येथे दरडी कोसळल्या होत्या, तर सिंहस्थातील रस्ते खराब झाले आहेत. पावसाची रिपरिप सुरूच आहे. सिन्नरला पावसाची प्रतीक्षाचसिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस पडत असताना पूर्वभागात केवळ रिमझिम पाऊस आहे. विहिरी व बंधाऱ्यांनी तळ गाठला असून, पूर्व भागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात होणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. मात्र पूर्व वावी, पांगरी, पाथरे परिसरातील नाले व विहिरी कोरड्या असल्याचे चित्र आहे. या भागात केवळ रिमझिम पाऊस होत असल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने या पूरपाण्याने पूर्व भागातील फुलेनगर (माळवाडी) व दुशिंगपूर येथील बंधारे भरून देण्याची मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)