शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

त्र्यंबकेश्वर : साधू-महंतांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By admin | Updated: May 26, 2015 00:03 IST

आखाड्यांतील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर

त्र्यंबकेश्वर : शहरातील रस्त्यांची कामे जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर असून, नंतर जी कामे मंजूर झाली ती मात्र अद्याप पूर्ण झाली नाहीत. आवाहन आखाड्याकडे जागा नसल्याने त्यांना काहीच सुविधा मिळाल्या नाहीत. अग्नी आखाड्याचे आउटलेटचे पाणी काढण्यास मार्ग नाही, त्यामुळे शौचालयाचे काम होऊनही ते रखडले आहे. निर्मल आखाड्याचीही तीच परिस्थिती आहे. कारण समोर गंगासागर तलाव असल्याने आउटलेटचे पाणी काढण्यास अडथळे निर्माण होत आहेत.जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी साधू आखाड्यांची बैठक सागरानंद आखाड्यात घेतली. यावेळी प्रत्येक आखाड्याला द्यावयाच्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, महेश पाटील, उदय किसवे, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, निवासी नायब तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आदि अधिकारी साधू-महंतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले होते, तर सर्व आखाड्यांचे महंत यावेळी उपस्थित होते. त्यावेळेस साधू-महंतांनी आपल्या समस्या मांडल्या. आवाहन आखाड्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी जागा देण्याबाबत असमर्थता व्यक्त करून जागा देण्याचा मला अधिकार नसून, तो राज्य सरकारचा आहे, असे स्पष्ट केले. त्यावर कुंभमेळा होईपर्यंत तात्पुरती सुविधा द्या, असे आवाहन आखाड्याचे महंत भरद्वाजगिरी यांनी सांगताच जिल्हाधिकारी यांनी त्यास तत्काळ मंजुरी दिली. तसेच अग्नी, निर्मल आखाड्यांचे उर्वरित कामेही पूर्ण करण्याचे आदेश दिले. दरम्यान, रिंगरोड व अन्य ठिकाणच्या रस्त्याला तडे गेले आहे याबाबतीत ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत साधू-महंतांनी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस विरोध करून मोहीम थांबवावी, अशी विनंती केली. यावर गरमागरम चर्चाही झाली. प्रशासनातर्फे आम्ही कोणतेही चुकीचे काम करीत नसून तुम्ही चुकीच्या कामांना पाठिंबा देत आहात, असा आरोप केला. न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही पालन करीत असून, संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविली जात आहे. येत्या १ जूनपासून ही मोहीम चार महिने पूर्णपणे थांबविली जाणार असून, ३१ मे रोजीपर्यंत पक्की अतिक्रमणे मात्र पाडण्यात येतील यावर प्रशासन ठाम आहे. विशेष म्हणजे, अतिक्रमणे काढण्याचा प्रस्ताव पालिका नगरसेवकांनीच केला आहे. तुम्हीच ठराव करता आणि तुम्हीच मोहीम थांबविण्यास सांगता हे कसे काय, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावले. हा प्रस्ताव २८ आॅगस्ट २०१४ च्या विशेष सभेत करण्यात आला आहे. (वार्ताहर)