शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला देवस्थान ट्रस्टतर्फे गुरुपासून वार्षिक रथोत्सव यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 19:20 IST

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सालाबाद प्रमाणे व पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या वर्षीदेखील कार्तिक पौर्णिमा तथा वैकुंठ चतुर्दशी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवारपासून सुरु होत आहे. हा सोहळा दोन दिवस संपन्न होत असुन मुख्य सोहळा गुरु वारी (दि.२२) रोजी संपन्न होईल.

ठळक मुद्देदोन दिवशीय धार्मिक सोहळ्याची तयारी पुर्ण

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सालाबाद प्रमाणे व पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या वर्षीदेखील कार्तिक पौर्णिमा तथा वैकुंठ चतुर्दशी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवारपासून सुरु होत आहे. हा सोहळा दोन दिवस संपन्न होत असुन मुख्य सोहळा गुरु वारी (दि.२२) रोजी संपन्न होईल.ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर मंदीराचा रथोत्सव सोहळा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी पारंपारीक पध्दतीने साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ज्या सरदार रघुनाथ विंचूरकर यांनी ज्योर्तिलिंग भगवान त्र्यंबकराजाला २२ फुट उंचीचा शिसवी लाकडापासुन तयार केलेला भव्य कोरीव नक्षीकामाची कलाकुसर केलेला रथ बहाल केला आहे. सरदार रघुनाथराव विंचुरकर घराण्याच्या वतीने त्यांचे पुरोहित विलास अग्निहोत्री देवस्थान ट्रस्टतर्फे बुधवारी (दि.२१) दुपारी १.३० ते ४ पर्यंत तसेच रात्री १० ते उत्तररात्री १ वाजेपर्यंत वैकुंठीची विशेष महापुजा पालखी सोहळा व हरिहर भेट सोहळा संपन्न होणारईल.हा सोहळा अवर्णनीय असतो.त्याचप्रमाणे गुरु वारी (दि.२२) रोजी दुपारी ३.३० वा. प्रत्यक्ष रथोत्सवास सुरु वात होणार असुन भगवान त्र्यंबक राजाची रथातुन सवाद्य पालखी मिरवणुक मेनरोडने निघेल. कुशावर्तावर स्नानादि महापुजा होईल. साधारणत: ६ वाजता सायंकाळी रथयात्रा मंदीराकडे परतीकडे मार्गक्र मण करेल. मधल्या वेळेत रथापुढे आकर्षक शोभेच्या दारुची आतषबाजी व विद्युत रोषणाई देवस्थान ट्रस्टतर्फे केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक, यात्रेकरु हजेरी लावतात. रात्री ८ वाजता दीपमाळेची पुजा होऊन रात्री दीपमाळ लावतात. त्यानंतर पुनश्च शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येते.संपुर्ण गावात उत्साह ओसंडून वाहत असतो. गावात सुखशांती समृद्धी यावी, गावात कुठलीही रोगराई येऊ नये पाऊस,पाणी चांगला पडावा यासाठी याच दिवशी सकाळी ११.३० वा. ग्रामदेवता महादेवीला गाडाभर भातबळी दिला जातो. बळीची ही प्रथा पारंपारीक पध्दतीने चालत आलेली आहे.