शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

त्र्यंबकेश्वरला देवस्थान ट्रस्टतर्फे गुरुपासून वार्षिक रथोत्सव यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 19:20 IST

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सालाबाद प्रमाणे व पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या वर्षीदेखील कार्तिक पौर्णिमा तथा वैकुंठ चतुर्दशी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवारपासून सुरु होत आहे. हा सोहळा दोन दिवस संपन्न होत असुन मुख्य सोहळा गुरु वारी (दि.२२) रोजी संपन्न होईल.

ठळक मुद्देदोन दिवशीय धार्मिक सोहळ्याची तयारी पुर्ण

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सालाबाद प्रमाणे व पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या वर्षीदेखील कार्तिक पौर्णिमा तथा वैकुंठ चतुर्दशी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवारपासून सुरु होत आहे. हा सोहळा दोन दिवस संपन्न होत असुन मुख्य सोहळा गुरु वारी (दि.२२) रोजी संपन्न होईल.ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर मंदीराचा रथोत्सव सोहळा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी पारंपारीक पध्दतीने साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ज्या सरदार रघुनाथ विंचूरकर यांनी ज्योर्तिलिंग भगवान त्र्यंबकराजाला २२ फुट उंचीचा शिसवी लाकडापासुन तयार केलेला भव्य कोरीव नक्षीकामाची कलाकुसर केलेला रथ बहाल केला आहे. सरदार रघुनाथराव विंचुरकर घराण्याच्या वतीने त्यांचे पुरोहित विलास अग्निहोत्री देवस्थान ट्रस्टतर्फे बुधवारी (दि.२१) दुपारी १.३० ते ४ पर्यंत तसेच रात्री १० ते उत्तररात्री १ वाजेपर्यंत वैकुंठीची विशेष महापुजा पालखी सोहळा व हरिहर भेट सोहळा संपन्न होणारईल.हा सोहळा अवर्णनीय असतो.त्याचप्रमाणे गुरु वारी (दि.२२) रोजी दुपारी ३.३० वा. प्रत्यक्ष रथोत्सवास सुरु वात होणार असुन भगवान त्र्यंबक राजाची रथातुन सवाद्य पालखी मिरवणुक मेनरोडने निघेल. कुशावर्तावर स्नानादि महापुजा होईल. साधारणत: ६ वाजता सायंकाळी रथयात्रा मंदीराकडे परतीकडे मार्गक्र मण करेल. मधल्या वेळेत रथापुढे आकर्षक शोभेच्या दारुची आतषबाजी व विद्युत रोषणाई देवस्थान ट्रस्टतर्फे केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक, यात्रेकरु हजेरी लावतात. रात्री ८ वाजता दीपमाळेची पुजा होऊन रात्री दीपमाळ लावतात. त्यानंतर पुनश्च शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येते.संपुर्ण गावात उत्साह ओसंडून वाहत असतो. गावात सुखशांती समृद्धी यावी, गावात कुठलीही रोगराई येऊ नये पाऊस,पाणी चांगला पडावा यासाठी याच दिवशी सकाळी ११.३० वा. ग्रामदेवता महादेवीला गाडाभर भातबळी दिला जातो. बळीची ही प्रथा पारंपारीक पध्दतीने चालत आलेली आहे.