शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला पावसाने पिकांना जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:33 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.

ठळक मुद्देतालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येऊ शकेल. कारण आवणीसाठी असाच भीज पाऊस हवा असतो. तालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरणी सध्याच्या रिमझिम पावसात आटोपली जाईल. पुढील तीन ते चार दिवसात जोरदार पावसाची गरज आहे. असाच पाऊस पडून ऊन पडल्यास उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण खरीप शेतीला सतत असाही पाऊस बरसत राहिल्यास पीक जास्तच तरारते.दरम्यान तुलनेने मागच्या वर्षापेक्षा यावर्षी कमी पाऊस असला तरी सध्या तरी पिकांसाठी उपयुक्त असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.कृषी विभागाने दिलेल्या पेरणी अहवालानुसार भात सर्वसाधारण क्षेत्र ११,६३४ हेक्टर पैकी ९६५४ हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. नागली ५३९४ हेक्टरपैकी २०६८.३१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. वरई ३२४१ हेक्टरपैकी ८२५.६ हेक्टर पेरणी झाली आहे, तर तूर, मूग, मसूर, उडीद या कडधान्याचे क्षेत्र कमी असल्याने पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी आतापर्र्यंत त्र्यंबकेश्वर ४७३ मिमी, वेळुंजे ६३४ मिमी व हरसूल ७३४ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी आतापर्यंत १४०० मिमी पाऊस झाला होता.

टॅग्स :Rainपाऊसtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर