शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

त्र्यंबकला पावसाने पिकांना जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:33 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.

ठळक मुद्देतालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येऊ शकेल. कारण आवणीसाठी असाच भीज पाऊस हवा असतो. तालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरणी सध्याच्या रिमझिम पावसात आटोपली जाईल. पुढील तीन ते चार दिवसात जोरदार पावसाची गरज आहे. असाच पाऊस पडून ऊन पडल्यास उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण खरीप शेतीला सतत असाही पाऊस बरसत राहिल्यास पीक जास्तच तरारते.दरम्यान तुलनेने मागच्या वर्षापेक्षा यावर्षी कमी पाऊस असला तरी सध्या तरी पिकांसाठी उपयुक्त असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.कृषी विभागाने दिलेल्या पेरणी अहवालानुसार भात सर्वसाधारण क्षेत्र ११,६३४ हेक्टर पैकी ९६५४ हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. नागली ५३९४ हेक्टरपैकी २०६८.३१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. वरई ३२४१ हेक्टरपैकी ८२५.६ हेक्टर पेरणी झाली आहे, तर तूर, मूग, मसूर, उडीद या कडधान्याचे क्षेत्र कमी असल्याने पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी आतापर्र्यंत त्र्यंबकेश्वर ४७३ मिमी, वेळुंजे ६३४ मिमी व हरसूल ७३४ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी आतापर्यंत १४०० मिमी पाऊस झाला होता.

टॅग्स :Rainपाऊसtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर