शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘मनरेगा’ला सरकारकडून हरताळ त्र्यंबकेश्वर : शंभर दिवसांच्या रोजगारानंतर युवक बेकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:44 IST

‘मागेल त्याला काम व कामाची हमी’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेतून मनरेगाची निर्मिती झाली आहे; मात्र ही संकल्पना फक्त १०० दिवसांपुरता मर्यादित आहे.

त्र्यंबकेश्वर : ‘मागेल त्याला काम व कामाची हमी’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेतून मनरेगाची निर्मिती झाली आहे; मात्र ही संकल्पना फक्त १०० दिवसांपुरता मर्यादित आहे. रोजगाराचे १०० दिवस पूर्ण झाले की त्यांना बेरोजगार व्हावे लागते, तर ही संकल्पना फसवी म्हणायची काय, असा सवाल ग्रामीण भागातील बेरोजगार ठरलेल्या युवकांनी केला आहे. तर १०० दिवसांनंतर पुढील रोजगाराची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणी त्र्यंबक पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भोये यांनी तहसीलदार महेंद्र पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.हरसूल येथील वनविकास महामंडळाचे मनरेगा अंतर्गत काम सुरू आहे; मात्र कामगारांचे मजुरीचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर या सर्व कामगारांना काम देण्यास नाकारण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भोये यांनी बेरोजगार होऊन घरी बसलेल्या मजुरांना काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी हरसूल येथील २०० ते २५० बेरोजगार उपस्थित होते. ‘मागेल त्याला काम व कामाची हमी’ ही योजना केंद्र सरकारची असून, एका कुटुंबातील ४ मजूर कामावर असले तर १०० दिवसांची विभागणी होऊन अवघ्या २५ दिवसांतच त्या कुटुंबाचे १०० दिवसांचे उद्दिष्ट पूर्ण धरले जात आहे. वास्तविक मुले मोठी झाल्यानंतर विवाह होतो. आणि विभक्त राहावयास गेले तरी स्वतंत्र शिधापत्रिकेअभावी असे कुटुंब मात्र एकत्रित धरले जाते. नवीन शिधापत्रिका मिळणे किती अवघड आहे, त्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेलच ! आदिवासी बेरोजगारांना रोजगाराची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून देण्याची गरज आहे ती त्यांची जबाबदारी आहे, दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मजुरीचे १०० दिवसांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर या कामगारांना काम देण्यास नकार दिला जातो. परिणामी कामगारास घरी बसावे लागते. यामुळे संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. हरसूल परिसरात दोन ते अडीच हजार लोक बेरोजगार झालेले असतील.यावेळी तहसीलदार महेंद्र पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन ईजीएस मनरेगा उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. रवींद्र भोये यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशीदेखील संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला आहे.