शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:18 IST

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.

ठळक मुद्देदोन तास ठिय्या : पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.तालुक्यातील महामार्गावर असलेल्या खंबाळे गावाच्या आदिवासी वस्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी जवळच्या नदीपात्रातून आणावे लागते. या वाडीला पिण्याचे पाणी मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी अनेकदा करूनही दखल घेतली नसल्याने या वाडीतील महिला संतप्त झाल्या होत्या. सकाळी या महिलांनी संघटित होत डोक्यावर रिकामे हंडे घेत रखरखत्या उन्हात तब्बल बारा किलोमीटर अंतर पायपीट करीत खंबाळे ते इगतपुरी असा मोर्चा काढला.हा मोर्चा इगतपुरी तहसील कार्यालयात आणण्यात आला मात्र सदर बाब पंचायत समितीच्या अखत्यारित असल्याचे समजल्याने या महिलांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळविला. हा मोर्चा पंचायत समितीत दाखल झाल्यानंतर संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्या दालनात प्रवेश करून गटविकास अधिकाºयांना जाब विचारला; मात्र या बाबीकडे गटविकास अधिकाºयाने गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गटविकास अधिकाºयांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्र मक पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, या मोर्चेकरू महिलांनी दूषित पाणी आणून गटविकास अधिकाºयांकडे दिले. ग्रामसेवकाची तत्काळ बदली करावी, पिण्यास पाणी मिळावे अशी मागणी लावून धरली.अखेर श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, तालुका महिला उपाध्यक्ष नीता गावंडा, शांताराम भगत आदींनी मध्यस्थी करीत मोर्चेकºयांची भूमिका पंचायत समिती प्रशासनाकडे मांडली. पंचायत समितीने सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.—————————————————————

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWomenमहिला