शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:18 IST

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.

ठळक मुद्देदोन तास ठिय्या : पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.तालुक्यातील महामार्गावर असलेल्या खंबाळे गावाच्या आदिवासी वस्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी जवळच्या नदीपात्रातून आणावे लागते. या वाडीला पिण्याचे पाणी मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी अनेकदा करूनही दखल घेतली नसल्याने या वाडीतील महिला संतप्त झाल्या होत्या. सकाळी या महिलांनी संघटित होत डोक्यावर रिकामे हंडे घेत रखरखत्या उन्हात तब्बल बारा किलोमीटर अंतर पायपीट करीत खंबाळे ते इगतपुरी असा मोर्चा काढला.हा मोर्चा इगतपुरी तहसील कार्यालयात आणण्यात आला मात्र सदर बाब पंचायत समितीच्या अखत्यारित असल्याचे समजल्याने या महिलांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळविला. हा मोर्चा पंचायत समितीत दाखल झाल्यानंतर संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्या दालनात प्रवेश करून गटविकास अधिकाºयांना जाब विचारला; मात्र या बाबीकडे गटविकास अधिकाºयाने गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गटविकास अधिकाºयांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्र मक पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, या मोर्चेकरू महिलांनी दूषित पाणी आणून गटविकास अधिकाºयांकडे दिले. ग्रामसेवकाची तत्काळ बदली करावी, पिण्यास पाणी मिळावे अशी मागणी लावून धरली.अखेर श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, तालुका महिला उपाध्यक्ष नीता गावंडा, शांताराम भगत आदींनी मध्यस्थी करीत मोर्चेकºयांची भूमिका पंचायत समिती प्रशासनाकडे मांडली. पंचायत समितीने सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.—————————————————————

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWomenमहिला