शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:18 IST

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.

ठळक मुद्देदोन तास ठिय्या : पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या एका आदिवासी वाडीला गेल्या दहा वर्षांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने तसेच या बाबीकडे स्थानिक ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त झालेल्या महिलांनी खंबाळे ते इगतपुरी पंचायत समिती असा बारा किलोमीटर अंतराचा पायी हंडामोर्चा काढला. हा मोर्चा आरंभी इगतपुरीच्या तहसील कार्यालयावर नेण्यात आला व नंतर पंचायत समितीवर धडकला.तालुक्यातील महामार्गावर असलेल्या खंबाळे गावाच्या आदिवासी वस्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी जवळच्या नदीपात्रातून आणावे लागते. या वाडीला पिण्याचे पाणी मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी अनेकदा करूनही दखल घेतली नसल्याने या वाडीतील महिला संतप्त झाल्या होत्या. सकाळी या महिलांनी संघटित होत डोक्यावर रिकामे हंडे घेत रखरखत्या उन्हात तब्बल बारा किलोमीटर अंतर पायपीट करीत खंबाळे ते इगतपुरी असा मोर्चा काढला.हा मोर्चा इगतपुरी तहसील कार्यालयात आणण्यात आला मात्र सदर बाब पंचायत समितीच्या अखत्यारित असल्याचे समजल्याने या महिलांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे वळविला. हा मोर्चा पंचायत समितीत दाखल झाल्यानंतर संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी किरण जाधव यांच्या दालनात प्रवेश करून गटविकास अधिकाºयांना जाब विचारला; मात्र या बाबीकडे गटविकास अधिकाºयाने गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी गटविकास अधिकाºयांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्र मक पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, या मोर्चेकरू महिलांनी दूषित पाणी आणून गटविकास अधिकाºयांकडे दिले. ग्रामसेवकाची तत्काळ बदली करावी, पिण्यास पाणी मिळावे अशी मागणी लावून धरली.अखेर श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे, तालुका महिला उपाध्यक्ष नीता गावंडा, शांताराम भगत आदींनी मध्यस्थी करीत मोर्चेकºयांची भूमिका पंचायत समिती प्रशासनाकडे मांडली. पंचायत समितीने सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.—————————————————————

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWomenमहिला