शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:15 IST

पिंपळगाव बसवंत : मूलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथील आदिवासी महिलांनी एकत्र येत प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध पदर खोसून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न करण्याचे हत्यार उपसले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतला पत्र : वीज-पाण्याबरोबर शौचालयांची समस्या; मूलभूत हक्कांपासून वंचित

पिंपळगाव बसवंत : मूलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथील आदिवासी महिलांनी एकत्र येत प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध पदर खोसून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न करण्याचे हत्यार उपसले आहे.निफाड तालुक्यातील पाचोरे वणी गावात असलेल्या दामबाबा आश्रमासमोरील रानभवानी वस्ती आहे. येथे ४५ आदिवासी कुटुंबे राहतात. वस्तीवरील नागरिकांचा आजही पाणी, वीज, शौचालयासाठी संघर्ष सुरू असल्याचे भयाण वास्तव पहावयास मिळते. स्वतंत्र काळानंतरही मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. येथील नागरिक कित्येक वर्षांपासून शासकीय सुविधेच्या प्रतीक्षेत आहे.दर पाच वर्षांनी निवडणूक येते; उमेदवार घर, पाणी, वीज देऊ असे आश्वासने देतात मात्र निवडून आल्यानंतर काहीच मिळत नाही. त्यामुळे यंदा कोणत्याही आश्वासनांना बळी पडता दि. २३ रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे पत्र संतप्त आदिवासी महिलांनी ग्राम-पंचायतीला दिले आहे.दोनशे ते तीनशे आदिवासी लोकवस्ती असलेल्या पाचोरे वणी, रानभवानी वस्तीत १८० नागरिकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड आहे. मात्र परिसरात कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र पहावयास मिळते. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वस्तीवर येतात. निवडणूक होईपर्यंत रात्रीच्या वेळी पहारे देतात.निवडणूक झाल्यावर फिरकूनही पाहत नाही. परिणामी परिसरात वीज, पाणी, आरोग्याच्या कुठल्याही सोयीसुविधा नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन आमच्यावर अन्याय करत असल्याची भावना येथील नागरिकांचे निर्माण झाली आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांहून अधिक काळ उलटला, मात्र आदिवासी समाज विकासाच्या कोसो दूर असल्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. या वस्तीत अजून पक्की घरे नाही, वीज नाही, पाणी नाही.शेती नसल्यामुळे बांधव मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवत आहेत. तरीदेखील येथील कुटुंबांचे दारिद्र्यरेषेच्या यादीत नाव नाही. कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही. शासनाने आशा वंचित वस्त्याकडे विकासाची गाडी वळवणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या वस्तीवरील समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली तरीही आमच्या आदिवासी महिला चिमणीचा दिव्या व चुलीजवळ दिसतात. धुरामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. गावोगावी वीज, घरकुल, पाणी पोहोचले म्हणणाºया शासनाचे तोंड झोडले पाहिजे. अशा खोटरड्या जुलमी शासनकर्त्यांविरोधात आम्ही संघटनेचे मोठे जनआंदोलन उभारू व आदिवासी बांधवांना न्यायहक्कासाठी लढत राहू.- वंदना कुडमते, महिला उत्तर महाराष्ट्र प्रमुख,आदिवासी शक्ती सेनाअनेक वर्षांपासून ग्रामपंचायत, बीडीओ, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करूनदेखील मूलभूत समस्या दूर करण्यात प्रशासन उदासीनता दाखवत आहे. जोपर्यंत स्वत: जिल्हाधिकारी आमच्या समस्यांचा आढावा घेऊन योग्य निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे. दि. २३ रोजी निवडणुकीवर बहिष्कार टाकणारच !- आशा कडाळे, अध्यक्ष, स्थानिक महिला मंडळ