शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

ताहाराबादच्या आदिवासींचा पंचायत समितीवर हल्लाबोल

By admin | Updated: March 7, 2017 00:34 IST

सटाणा : घरकुल अनुदान रखडल्याने पाच ते सहा वर्षांपासून उघड्यावर संसार असलेल्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील संतप्त आदिवासी बांधवांनी येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला.

 सटाणा : घरकुल अनुदान रखडल्याने अक्षरश: गेल्या पाच ते सहा वर्षांपासून उघड्यावर संसार असलेल्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील संतप्त दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांनी आज सोमवारी येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला. अचानक केलेल्या हल्लाबोलमुळे प्रशासनाची धावपळ उडाली.ताहाराबाद ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रावेर आदिवासी वस्तीत गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी १६३ घरकुल मंजूर करण्यात आले होते. घरे मंजूर झालेल्या आदिवासी बांधवांनी नव्या बांधकामासाठी जुन्या घरांची बांधकामे पाडली. त्यामुळे त्यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आहे. वेळोवेळी अनुदानासाठी पाठपुरावा केल्यानंतर पहिला हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर अनुदान रखडल्याने गेल्या काही वर्षांपासून उघड्यावर संसार पडला आहे. निवारा नसल्यामुळे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण नाही. अनुदानासाठी अनेकवेळा ग्रामसेवकाकडे पाठपुरावा केला; मात्र उडवाउडवीच्या उत्तराशिवाय काही हाती न आल्याने संतप्त झालेल्या शंभर ते दीडशे आदिवासी बांधवांनी आज सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त आदिवासी बांधवांनी गोंधळ घातल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. संतप्त आदिवासींचा जमाव पाहून कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार, ताहाराबादच्या सरपंच रत्ना सोनवणे, उपसरपंच प्रदीप कांकरिया, सीताराम साळवे यांनी जमावाला शांत करून मध्यस्थीची भूमिका घेतली. पंचायत समिती सभागृहात ग्रामविस्तार अधिकारी व्ही.पी. जाधव, रामकृष्ण खैरनार, घरकुलचे नितीन पाटील, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांना पाचारण करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या नियमानुसार जे घरकुल मंजूर आहेत. आणि अनुदान हप्ता प्राप्त करण्यासाठी ज्या अटी-शर्ती लागू आहेत. त्यापूर्ण असतील अशा लाभार्थींना मार्चअखेर त्या टप्प्यातील अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनतर आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात महेश साळवे, दत्तू सोनवणे, रतन सोनवणे, शांताराम माळी, हरिश्चंद्र सोनवणे, केवळ मोरे, लक्ष्मण सोनवणे, भिवसन सोनवणे, शांताराम सोनवणे, रवींद्र माळी, गोटू सोनवणे, पिंटू अहिरे, हिरामण बाळू, कौतिक मोरे, धर्मा माळी, अंकुश सूर्यवंशी, विनोद सोनवणे यांच्यासह लाभार्थी आदिवासी बांधव सहभागी झाले होते. (वार्ताहर)