शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

ताहाराबादच्या आदिवासींचा पंचायत समितीवर हल्लाबोल

By admin | Updated: March 7, 2017 00:34 IST

सटाणा : घरकुल अनुदान रखडल्याने पाच ते सहा वर्षांपासून उघड्यावर संसार असलेल्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील संतप्त आदिवासी बांधवांनी येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला.

 सटाणा : घरकुल अनुदान रखडल्याने अक्षरश: गेल्या पाच ते सहा वर्षांपासून उघड्यावर संसार असलेल्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील संतप्त दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांनी आज सोमवारी येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला. अचानक केलेल्या हल्लाबोलमुळे प्रशासनाची धावपळ उडाली.ताहाराबाद ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रावेर आदिवासी वस्तीत गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी १६३ घरकुल मंजूर करण्यात आले होते. घरे मंजूर झालेल्या आदिवासी बांधवांनी नव्या बांधकामासाठी जुन्या घरांची बांधकामे पाडली. त्यामुळे त्यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आहे. वेळोवेळी अनुदानासाठी पाठपुरावा केल्यानंतर पहिला हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर अनुदान रखडल्याने गेल्या काही वर्षांपासून उघड्यावर संसार पडला आहे. निवारा नसल्यामुळे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण नाही. अनुदानासाठी अनेकवेळा ग्रामसेवकाकडे पाठपुरावा केला; मात्र उडवाउडवीच्या उत्तराशिवाय काही हाती न आल्याने संतप्त झालेल्या शंभर ते दीडशे आदिवासी बांधवांनी आज सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक येथील पंचायत समिती कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त आदिवासी बांधवांनी गोंधळ घातल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. संतप्त आदिवासींचा जमाव पाहून कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार, ताहाराबादच्या सरपंच रत्ना सोनवणे, उपसरपंच प्रदीप कांकरिया, सीताराम साळवे यांनी जमावाला शांत करून मध्यस्थीची भूमिका घेतली. पंचायत समिती सभागृहात ग्रामविस्तार अधिकारी व्ही.पी. जाधव, रामकृष्ण खैरनार, घरकुलचे नितीन पाटील, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांना पाचारण करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या नियमानुसार जे घरकुल मंजूर आहेत. आणि अनुदान हप्ता प्राप्त करण्यासाठी ज्या अटी-शर्ती लागू आहेत. त्यापूर्ण असतील अशा लाभार्थींना मार्चअखेर त्या टप्प्यातील अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनतर आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात महेश साळवे, दत्तू सोनवणे, रतन सोनवणे, शांताराम माळी, हरिश्चंद्र सोनवणे, केवळ मोरे, लक्ष्मण सोनवणे, भिवसन सोनवणे, शांताराम सोनवणे, रवींद्र माळी, गोटू सोनवणे, पिंटू अहिरे, हिरामण बाळू, कौतिक मोरे, धर्मा माळी, अंकुश सूर्यवंशी, विनोद सोनवणे यांच्यासह लाभार्थी आदिवासी बांधव सहभागी झाले होते. (वार्ताहर)