शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 21:27 IST

सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात सर्वच ठिकाणी चांगल्या सुसंस्कृत प्रतिनिधींना पाठविण्यासाठी एकजुटीने राहिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मातापित्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन कलियुगातला एकलव्य तयार केला पाहिजे, असे मत आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदिलीप बोरसे : आदिवासी एकता परिषदेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात सर्वच ठिकाणी चांगल्या सुसंस्कृत प्रतिनिधींना पाठविण्यासाठी एकजुटीने राहिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मातापित्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन कलियुगातला एकलव्य तयार केला पाहिजे, असे मत आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले.येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एकता परिषदेचे संस्थापक सचिव डोंगर बागुल होते. आदिवासी समाजाने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता सरकारी दवाखान्याचा आधार घेणे आज काळाची गरज असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार यांनी सांगितले. आदिवासी समाजाचा खरा इतिहास आजपर्यंत पुढे न आल्यामुळेच खरा इतिहास काय आहे ते समजले नाही. त्यासाठी प्रत्येकाने आदिवासींचा इतिहास समजून घेण्याची गरज असल्याचे अध्यक्षस्थानावरून बोलताना बागुल म्हणाले.या वेळी महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख सुनील गायकवाड, युवा राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, जिल्हा सचिव राजेंद्र माळी, केंद्रीय आंदोलन समितीचे सदस्य कैलास पवार यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी एकता युवा जिल्हाध्यक्ष साहेबराव आहिरे, तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, शहराध्यक्ष बाळासाहेब बागुल, उपशहराध्यक्ष सचिन पवार, उपतालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, नंदू शिंदे, रवि पवार, अनिता माळी यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :MLAआमदारRural Developmentग्रामीण विकास