शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 21:27 IST

सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात सर्वच ठिकाणी चांगल्या सुसंस्कृत प्रतिनिधींना पाठविण्यासाठी एकजुटीने राहिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मातापित्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन कलियुगातला एकलव्य तयार केला पाहिजे, असे मत आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदिलीप बोरसे : आदिवासी एकता परिषदेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात सर्वच ठिकाणी चांगल्या सुसंस्कृत प्रतिनिधींना पाठविण्यासाठी एकजुटीने राहिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मातापित्यांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन कलियुगातला एकलव्य तयार केला पाहिजे, असे मत आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले.येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एकता परिषदेचे संस्थापक सचिव डोंगर बागुल होते. आदिवासी समाजाने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता सरकारी दवाखान्याचा आधार घेणे आज काळाची गरज असल्याचे जिल्हा परिषद सदस्य रेखा पवार यांनी सांगितले. आदिवासी समाजाचा खरा इतिहास आजपर्यंत पुढे न आल्यामुळेच खरा इतिहास काय आहे ते समजले नाही. त्यासाठी प्रत्येकाने आदिवासींचा इतिहास समजून घेण्याची गरज असल्याचे अध्यक्षस्थानावरून बोलताना बागुल म्हणाले.या वेळी महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख सुनील गायकवाड, युवा राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमचंद सोनवणे, जिल्हा सचिव राजेंद्र माळी, केंद्रीय आंदोलन समितीचे सदस्य कैलास पवार यांची भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी एकता युवा जिल्हाध्यक्ष साहेबराव आहिरे, तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, शहराध्यक्ष बाळासाहेब बागुल, उपशहराध्यक्ष सचिन पवार, उपतालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, नंदू शिंदे, रवि पवार, अनिता माळी यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :MLAआमदारRural Developmentग्रामीण विकास