शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

वनमंत्र्यांनी लावले होते झाड, चार वर्षांनंतर जागा ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST

ओझर : राज्यात फडणवीस सरकारच्या काळात लावलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी विधिमंडळ समितीच्या सदस्यांमार्फत करण्याची घोषणा बुधवारी (दि.४) उपमुख्यमंत्री ...

ओझर : राज्यात फडणवीस सरकारच्या काळात लावलेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी विधिमंडळ समितीच्या सदस्यांमार्फत करण्याची घोषणा बुधवारी (दि.४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली असतानाच तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ओझर येथे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वहस्ते लागवड केलेला वृक्षच जळून गेल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे जेथे वनमंत्र्यांनी लावलेल्या वृक्षाचेच नीटसे संवर्धन झालेले नाही, तेथे अन्य लागवडीची काय कथा, असा प्रश्न त्यानमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात ‘एकच लक्ष, ३३ कोटी वृक्ष’ या मोहिमेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी ओझर येथे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ दिमाखात करण्यात आला होता. त्यानंतर ओझर येथीलच किनो थिएटरला कार्यक्रमही पार पडला होता. सन २०१७ मध्ये दि. १ ते ७ जुलै या सप्ताहात राज्य सरकारने वनमहोत्सवाचे आयोजन केले होते. या सप्ताहात चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ऐन पावसाळ्यात हे मिशन राबविले गेल्याने कमी वेळेत जास्त कार्यक्रम ही भूमिका घेत वनमंत्र्यांनी विमानाने जाऊन राज्यात एकाचवेळी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यानुसार दि. ४ जुलै २०१७ रोजी तत्कालीन वनमंत्री नाशिकला ओझर विमानतळ येथे उतरणार असल्याने वेळेचे गणित लक्षात घेता परिसरातील जवळच्या जागेतच वृक्षलागवडीचे नियोजन चांदवडच्या वनाधिकाऱ्यांना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, वनाधिकाऱ्यांनी एचएएल प्रशासनाला विनंती केल्यानंतर एचएएलमधील गणपती मंदिराजवळील जागा वृक्षलागवडीसाठी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार रेड कार्पेट आंथरत वनमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम थाटात पार पडला होता. यावेळी भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते. मात्र, चार वर्षांनंतर आता संबंधित जागेत ओसाड माळरान असून, खुद्द वनमंत्र्यांनी लावलेला वृक्षही वनविभागाला जोपासता आलेला नसल्याचे दिसून आले. ज्याठिकाणी वनमंत्र्यांनी वृक्षलागवड केली त्याठिकाणी केवळ एक खड्डा उरला आहे. वृक्षासोबत लावण्यात आलेली वनमंत्र्यांच्या नावाची पाटीही तेथून गायब झालेली आहे.

इन्फो

लागवड अन‌् फोटोसेशन

राज्य शासनाच्या वनमंत्रायलयामार्फत त्यावेळी ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते आणि तशी पूर्तताही करण्यात आली होती. परंतु, वृक्षलागवडीनंतर एखाद्यावर जबाबदारी निश्चित करून त्याचे ज्या पद्धतीने संवर्धन व्हायला हवे होते, ते होत नाही. त्यामुळे वृक्षलागवड मोहीम ही बऱ्याचदा केवळ फोटोसेशनपुरताच मर्यादित ठरत आलेली आहे. ओझर येथे खुद्द वनमंत्र्यांच्या हस्ते लावण्यात आलेले झाड वनविभागाला जोपासता आले नाही. त्यामुळे वनविभागाच्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल आणि जिल्ह्यातील वृक्षलागवडीवरही त्यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फोटो : ०४ ओझर ट्री-१

४ जुलै २०१७ : राज्याचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते एचएएल परिसरात करण्यात आलेले वृक्षारोपण.

फोटो- ०४ओझर ट्री-२

४ मार्च २०२१ ज्याठिकाणी वृक्षारोपण झाले होते त्या परिसरात ओसाड पडलेले माळरान.

===Photopath===

040321\04nsk_18_04032021_13.jpg~040321\04nsk_19_04032021_13.jpg

===Caption===

 फोटो : ०४ ओझर ट्री-१४ जुलै २०१७ : राज्याचे तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते एचएएल परिसरात करण्यात आलेले वृक्षारोपण. ~फोटो- ०४ओझर ट्री-२४ मार्च २०२१ ज्याठिकाणी वृक्षारोपण झाले होते त्या परिसरात ओसाड पडलेले माळरान.