शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

हरिहर गडावर ट्रेकर्सचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:45 IST

‘ट्रेकिंग’च्या नावाखाली मद्यप्राशनाची हौस भागविण्यासाठी गड-किल्ल्यांची निवड करणाºयांची वाढती संख्या निसर्गासाठी हानीकारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक हरिहर गडावर अशाच एका मद्यपी ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने रानगवताला आग लावत धुडगूस घातल्याने संताप व्यक्त होत आहे.

नाशिक : ‘ट्रेकिंग’च्या नावाखाली मद्यप्राशनाची हौस भागविण्यासाठी गड-किल्ल्यांची निवड करणाºयांची वाढती संख्या निसर्गासाठी हानीकारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक हरिहर गडावर अशाच एका मद्यपी ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने रानगवताला आग लावत धुडगूस घातल्याने संताप व्यक्त होत आहे.  नाशिक शहरापासून अवघ्या ४० ते ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक अशा अवघड श्रेणीमधील हरिहर गडावर पौर्णिमेच्या प्रकाशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने हैदोस घातला. येथील गवत पेटवून देत मोठ्या आवाजाचे फटाके फोडून निसर्गाची हानी पोहचविण्याचा प्रयत्न केला. गवताला आग लागल्यानंतर गडावरील वृक्षसंपदेसह पशू-पक्ष्यांचे वास्तव्यही धोक्यात आले होते. येथील जैवविविधतेला हानी पोहचविणाºया ‘त्या’ अज्ञात टवाळखोरांविरुद्ध घोटी पोलीस व त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निरगुडपाडा व हर्षेवाडी भागातील रहिवाशांनी केली आहे. फटाक्यांचा दणदणाट, पेटविलेल्या गवताने वाढलेली आग यामुळे येथील पक्षी-प्राणी सैरभैर झाले होते. हा प्रकार गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर काही आदिवासी बांधवांनी गडावर धाव घेतली.  दरम्यान, मद्य व गांजाच्या नशेत धुंद असलेल्या टोळक्याने गावकºयांसोबत वाद घालत धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केल्याने गावकरी माघारी फिरले. टाके हर्ष गावात या टोळक्याने वाहने उभी करून हरिहर गडावर मुक्काम ठोकला होता.वनविभागाकडून तक्रार त्र्यंबक वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील हरिहर गडावरील लावलेल्या आगीची तीव्रता शनिवारी वनरक्षकांनी पाहणी करून तपासली; मात्र जंगल पेटलेले नव्हते तर शेकोट्यांमुळे काही प्रमाणात गवताची जाळपोळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वन व वन्यजिवांना धोका पोहचविण्याचा केलेला प्रयत्न आणि गावकºयांशी घातलेला वाद लक्षात घेऊन वनरक्षकाने अज्ञात ट्रेकर्सविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांकडून संबंधित गावकºयांकडून माहिती घेऊन त्यांचा शोध घेतला जाणार आहे. वनविभागाकडूनही वनसंवर्धन कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास आहिरे यांनी सांगितले.‘ट्रेकिंग’च्या नावाखाली अशा प्रकारे गड-किल्ल्यांवर धुडगूस घालणे गैर आहे. यामुळे प्रामाणिक गिर्यारोहक अडचणीत सापडले आहेत. अशा टवाळखोर व मद्यपींवर वनविभागासह पोलिसांनी कारवाई करावी. गिरीभ्रमंती करताना केवळ आपल्या पाऊलखुणांव्यतिरिक्त गड-किल्ल्यांवर कुठलीही वस्तू गिर्यारोहक व दुर्गपर्यटकांनी ठेवणे अपेक्षित नाही. - अंबरिश मोरे, गिर्यारोहक