शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

हरिहर गडावर ट्रेकर्सचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:45 IST

‘ट्रेकिंग’च्या नावाखाली मद्यप्राशनाची हौस भागविण्यासाठी गड-किल्ल्यांची निवड करणाºयांची वाढती संख्या निसर्गासाठी हानीकारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक हरिहर गडावर अशाच एका मद्यपी ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने रानगवताला आग लावत धुडगूस घातल्याने संताप व्यक्त होत आहे.

नाशिक : ‘ट्रेकिंग’च्या नावाखाली मद्यप्राशनाची हौस भागविण्यासाठी गड-किल्ल्यांची निवड करणाºयांची वाढती संख्या निसर्गासाठी हानीकारक ठरत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक हरिहर गडावर अशाच एका मद्यपी ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने रानगवताला आग लावत धुडगूस घातल्याने संताप व्यक्त होत आहे.  नाशिक शहरापासून अवघ्या ४० ते ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक अशा अवघड श्रेणीमधील हरिहर गडावर पौर्णिमेच्या प्रकाशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या ‘ट्रेकर्स’च्या टोळक्याने हैदोस घातला. येथील गवत पेटवून देत मोठ्या आवाजाचे फटाके फोडून निसर्गाची हानी पोहचविण्याचा प्रयत्न केला. गवताला आग लागल्यानंतर गडावरील वृक्षसंपदेसह पशू-पक्ष्यांचे वास्तव्यही धोक्यात आले होते. येथील जैवविविधतेला हानी पोहचविणाºया ‘त्या’ अज्ञात टवाळखोरांविरुद्ध घोटी पोलीस व त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निरगुडपाडा व हर्षेवाडी भागातील रहिवाशांनी केली आहे. फटाक्यांचा दणदणाट, पेटविलेल्या गवताने वाढलेली आग यामुळे येथील पक्षी-प्राणी सैरभैर झाले होते. हा प्रकार गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर काही आदिवासी बांधवांनी गडावर धाव घेतली.  दरम्यान, मद्य व गांजाच्या नशेत धुंद असलेल्या टोळक्याने गावकºयांसोबत वाद घालत धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केल्याने गावकरी माघारी फिरले. टाके हर्ष गावात या टोळक्याने वाहने उभी करून हरिहर गडावर मुक्काम ठोकला होता.वनविभागाकडून तक्रार त्र्यंबक वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील हरिहर गडावरील लावलेल्या आगीची तीव्रता शनिवारी वनरक्षकांनी पाहणी करून तपासली; मात्र जंगल पेटलेले नव्हते तर शेकोट्यांमुळे काही प्रमाणात गवताची जाळपोळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वन व वन्यजिवांना धोका पोहचविण्याचा केलेला प्रयत्न आणि गावकºयांशी घातलेला वाद लक्षात घेऊन वनरक्षकाने अज्ञात ट्रेकर्सविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांकडून संबंधित गावकºयांकडून माहिती घेऊन त्यांचा शोध घेतला जाणार आहे. वनविभागाकडूनही वनसंवर्धन कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास आहिरे यांनी सांगितले.‘ट्रेकिंग’च्या नावाखाली अशा प्रकारे गड-किल्ल्यांवर धुडगूस घालणे गैर आहे. यामुळे प्रामाणिक गिर्यारोहक अडचणीत सापडले आहेत. अशा टवाळखोर व मद्यपींवर वनविभागासह पोलिसांनी कारवाई करावी. गिरीभ्रमंती करताना केवळ आपल्या पाऊलखुणांव्यतिरिक्त गड-किल्ल्यांवर कुठलीही वस्तू गिर्यारोहक व दुर्गपर्यटकांनी ठेवणे अपेक्षित नाही. - अंबरिश मोरे, गिर्यारोहक