शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

नाशिकसह नऊ तहसीलदारांच्या बदल्या

By श्याम बागुल | Updated: August 24, 2018 15:56 IST

नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी राहिली होती.

ठळक मुद्देरिक्त जागा भरल्या : विभागात १९ नियुक्त्यासर्वांना तत्काळ पदमुक्त करण्यात यावे शाासनाचे आदेश आहेत.

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील १९ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यात नाशिकच्या राजश्री अहिरराव यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या बागलाण व नांदगाव या तालुक्यालादेखील या बदल्यांमध्ये पूर्णवेळ तहसीलदार मिळाला आहे. विशेष म्हणजे बागलाणच्या तहसीलदारांच्या बदलीसाठी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप यानिमित्ताने खरा ठरला आहे.नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी राहिली होती. मध्यंतरी त्यांच्याकडून अर्धन्यायिक कामकाज काढून घेत पंख छाटण्यात आले होते. शिवाय त्यांच्या बदलीसाठी अन्य इच्छुक तहसीलदारांप्रमाणेच खुद्द जिल्हाधिकारीदेखील उत्सुक असल्याची चर्चा कायमच रंगत होती. या बदल्यांमध्ये गेल्या मे महिन्यात बागलाण तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेल्या वंदना खरमाळे यांची अखेर इगतपुरीत नेमणूक करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या बागलाणसाठी नंदुरबारहून प्रमोद हिले यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर इगतपुरीचे अनिल पुरे यांची नाशिक शहर धान्य वितरण अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, धान्य वितरण अधिकारी शर्मिला भोसले यांची विभागीय आयुक्तालयात नियुक्ती झाली आहे. नांदगाव तहसीलदारपदी पारनेरच्या भारती अण्णासाहेब सगरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकरोडच्या महसूल प्रबोधिनीच्या अर्चना खेतमाळीस यांची एरंडोल येथे, तर विभागीय आयुक्तालयातील मंजूषा घाडगे यांची महसूल प्रबोधिनी येथे बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे दत्तात्रय शेजूळ यांची देवळा तहसीलदार म्हणून, तर देवळ्याचे कैलास पवार यांची नगरला बदली झाली आहे. येवल्याचे नरेशकुमार बहिरम यांची पिंपळनेर -साक्रीला बदली झाली असून, त्यांच्या जागी दोंडाईचा येथील रोहिदास वारुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगरच्या रचना पवार यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये नाशिक विभागातील १९ तहसीलदारांचा समावेश असून, या सर्वांना तत्काळ पदमुक्त करण्यात यावे, असे शाासनाचे आदेश आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक