शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

‘त्या’ वीजवाहिनीचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:05 IST

सटाणा/औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील धोकादायक उच्चदाबाच्या वीजवाहिनीचे महावितरणकडून अखेर स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांनीही अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, घेराव तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत’मध्ये या संबंधीचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन वीजवाहिनीचे स्थलांतर करण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणकडून तातडीने दखल : औंदाणे ग्रामस्थांचे समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा/औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील धोकादायक उच्चदाबाच्या वीजवाहिनीचे महावितरणकडून अखेर स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांनीही अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, घेराव तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत’मध्ये या संबंधीचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन वीजवाहिनीचे स्थलांतर करण्यात आले.येथील यशवंतनगरजवळून उच्च दाबाची वीजवाहिनी गेल्याने तेथील नागरिकांना बांधकाम करता येत नव्हते. तसेच सदर वाहिनी जीवघेणी ठरत होती. ही वाहिनी गावाबाहेर स्थलांतरित करावी, याबाबत आठ वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या सदस्य शर्र्मिला गोसावी व नागरिकांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच अधिकारी खडबडून जागे झाले. वृत्ताची दखल घेत सदरची वीजवाहिनी स्थलांतरित केली. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेकांच्या घराच्या छतावरील विजेच्या तारांजवळून सदरची वाहिनी जात असल्याने रहिवाशांमध्ये घबराट होती. नेहमी भीतीच्या सावटाखाली राहावे लागत असे. यामुळे टेरेसवर कपडे वाळत घालताना मोठी कसरत करावी लागत असे. तसेच घराचा मजला बांधता येत नसल्याने गैरसोय होत होती.याबाबत ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकारी व संबंधितांकडे वीजवाहिनी स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यासाठी निवेदन, अभियंत्यांना घेराव घातला होता. तरीही समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. येथील उच्चदाब वीजवाहिनीबाबत सुमारे आठ वर्षांपासून वीज कंपनीकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर नागरिकांसह महिलांनी अभियंत्यांना घेरावही घातला होता. मात्र दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत‘मध्ये वृत्त प्रकाशित होताच वाहिनी स्थलांतरित केल्यााने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.- शर्मिला गोसावी, सदस्य, ग्रामपंचायतवाहिनी घरांच्या छताला लागूनच होती. महिला व लहान मुले घराच्या छतावर गेल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ही वाहिनी हटविल्याशिवाय ग्रामस्थांना घराचे बांधकामही करता येत नव्हते. त्यामुळे सदरची वाहिनी स्थलांतरित करणे गरजेचे होते.- नारायण अहिरे, ग्रामस्थ

टॅग्स :NashikनाशिकMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ