शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

‘त्या’ वीजवाहिनीचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:05 IST

सटाणा/औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील धोकादायक उच्चदाबाच्या वीजवाहिनीचे महावितरणकडून अखेर स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांनीही अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, घेराव तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत’मध्ये या संबंधीचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन वीजवाहिनीचे स्थलांतर करण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणकडून तातडीने दखल : औंदाणे ग्रामस्थांचे समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा/औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील धोकादायक उच्चदाबाच्या वीजवाहिनीचे महावितरणकडून अखेर स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांनीही अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, घेराव तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत’मध्ये या संबंधीचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन वीजवाहिनीचे स्थलांतर करण्यात आले.येथील यशवंतनगरजवळून उच्च दाबाची वीजवाहिनी गेल्याने तेथील नागरिकांना बांधकाम करता येत नव्हते. तसेच सदर वाहिनी जीवघेणी ठरत होती. ही वाहिनी गावाबाहेर स्थलांतरित करावी, याबाबत आठ वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या सदस्य शर्र्मिला गोसावी व नागरिकांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच अधिकारी खडबडून जागे झाले. वृत्ताची दखल घेत सदरची वीजवाहिनी स्थलांतरित केली. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेकांच्या घराच्या छतावरील विजेच्या तारांजवळून सदरची वाहिनी जात असल्याने रहिवाशांमध्ये घबराट होती. नेहमी भीतीच्या सावटाखाली राहावे लागत असे. यामुळे टेरेसवर कपडे वाळत घालताना मोठी कसरत करावी लागत असे. तसेच घराचा मजला बांधता येत नसल्याने गैरसोय होत होती.याबाबत ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकारी व संबंधितांकडे वीजवाहिनी स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यासाठी निवेदन, अभियंत्यांना घेराव घातला होता. तरीही समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. येथील उच्चदाब वीजवाहिनीबाबत सुमारे आठ वर्षांपासून वीज कंपनीकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर नागरिकांसह महिलांनी अभियंत्यांना घेरावही घातला होता. मात्र दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत‘मध्ये वृत्त प्रकाशित होताच वाहिनी स्थलांतरित केल्यााने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.- शर्मिला गोसावी, सदस्य, ग्रामपंचायतवाहिनी घरांच्या छताला लागूनच होती. महिला व लहान मुले घराच्या छतावर गेल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ही वाहिनी हटविल्याशिवाय ग्रामस्थांना घराचे बांधकामही करता येत नव्हते. त्यामुळे सदरची वाहिनी स्थलांतरित करणे गरजेचे होते.- नारायण अहिरे, ग्रामस्थ

टॅग्स :NashikनाशिकMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ