शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘त्या’ वीजवाहिनीचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:05 IST

सटाणा/औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील धोकादायक उच्चदाबाच्या वीजवाहिनीचे महावितरणकडून अखेर स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांनीही अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, घेराव तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत’मध्ये या संबंधीचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन वीजवाहिनीचे स्थलांतर करण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणकडून तातडीने दखल : औंदाणे ग्रामस्थांचे समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा/औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील धोकादायक उच्चदाबाच्या वीजवाहिनीचे महावितरणकडून अखेर स्थलांतर करण्यात आले. ग्रामस्थांनीही अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, घेराव तसेच तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत’मध्ये या संबंधीचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन वीजवाहिनीचे स्थलांतर करण्यात आले.येथील यशवंतनगरजवळून उच्च दाबाची वीजवाहिनी गेल्याने तेथील नागरिकांना बांधकाम करता येत नव्हते. तसेच सदर वाहिनी जीवघेणी ठरत होती. ही वाहिनी गावाबाहेर स्थलांतरित करावी, याबाबत आठ वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या सदस्य शर्र्मिला गोसावी व नागरिकांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच अधिकारी खडबडून जागे झाले. वृत्ताची दखल घेत सदरची वीजवाहिनी स्थलांतरित केली. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेकांच्या घराच्या छतावरील विजेच्या तारांजवळून सदरची वाहिनी जात असल्याने रहिवाशांमध्ये घबराट होती. नेहमी भीतीच्या सावटाखाली राहावे लागत असे. यामुळे टेरेसवर कपडे वाळत घालताना मोठी कसरत करावी लागत असे. तसेच घराचा मजला बांधता येत नसल्याने गैरसोय होत होती.याबाबत ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकारी व संबंधितांकडे वीजवाहिनी स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यासाठी निवेदन, अभियंत्यांना घेराव घातला होता. तरीही समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. येथील उच्चदाब वीजवाहिनीबाबत सुमारे आठ वर्षांपासून वीज कंपनीकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर नागरिकांसह महिलांनी अभियंत्यांना घेरावही घातला होता. मात्र दखल घेतली जात नव्हती. ‘लोकमत‘मध्ये वृत्त प्रकाशित होताच वाहिनी स्थलांतरित केल्यााने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.- शर्मिला गोसावी, सदस्य, ग्रामपंचायतवाहिनी घरांच्या छताला लागूनच होती. महिला व लहान मुले घराच्या छतावर गेल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ही वाहिनी हटविल्याशिवाय ग्रामस्थांना घराचे बांधकामही करता येत नव्हते. त्यामुळे सदरची वाहिनी स्थलांतरित करणे गरजेचे होते.- नारायण अहिरे, ग्रामस्थ

टॅग्स :NashikनाशिकMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ