शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाचा खर्च ‘पाण्यात’; तीन वर्षांनंतर केले आयोजन

By admin | Updated: January 30, 2015 00:14 IST

दुर्लक्ष : पंचायत समिती सदस्यांची नाराजी

नाशिक : नव्यानेच निवडून आलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेऊन त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येते. जिल्हा परिषदेने मात्र तीन वर्षांनंतर सर्व १४६ पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्याने आता उर्वरित दोन वर्षांत काय योजना मार्गी लावणार, असा प्रश्न पंचायत समिती सदस्यांमधून करण्यात येत आहे.राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्णातील १४६ पंचायत समिती सदस्यांसाठी १९ जानेवारी ते २९ जानेवारीदरम्यान टप्प्या-टप्प्याने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरालगतच असलेल्या हॉटेल आय होप येथे या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असले तरी पंचायत समिती सदस्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था मात्र व्यवस्थित नसल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. एका रूममध्ये दोन सदस्यांची निवासाची सोय असताना प्रत्यक्षात एकेका रूममध्ये तीन तीन पंचायत समिती सदस्यांची व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान उपसभापती अनिल ढिकले यांनी केला आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी ६ लाख ३५ हजारांची तरतूद असल्याचे कळते. तसेच आता तीन वर्ष उलटल्यानंतर पंचायत समिती सदस्यांना प्रशिक्षण दिल्याने उर्वरित दोन वर्षांत काय योजना राबविणार व तसेच पुढील वर्षी आरक्षण व नव्याने निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.