शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

भगूर भागातील रस्त्यांची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:56 IST

भगूर शहराशी परिसरातील ग्रामीण भागातील किमान पन्नास खेड्ड्यांचा संपर्क असून, मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भगूर भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे विंचुरी दळवी, राहुरी, दोनवाडे, पांढुर्ली रस्त्याची अक्षरश: चाळण झाली

भगूर : भगूर शहराशी परिसरातील ग्रामीण भागातील किमान पन्नास खेड्ड्यांचा संपर्क असून, मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भगूर भागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे विंचुरी दळवी, राहुरी, दोनवाडे, पांढुर्ली रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न येथील नागरिकांना पडला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने भगूर पांढुर्ली रस्त्याची तत्काळ दुरु स्ती करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.भगूर व परिसरात पांढुर्ली रस्त्यावरून राहुरी, दोन वाडे, विंचुरी दळवी, पांढुर्ली, शिवडा, शेणीत, बेलू, आगसखिंड आदीसह इतरही खेड्ड्यातील नोकरदार वर्ग, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी प्रवास करत असतात. परंतु आज भगूर ते पांढुर्ली यादरम्यान रस्त्याच्या मधोमध मोठे-मोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे दिवसा छोटे-मोठे अपघात घडत असून, रात्रीच्या वेळेस जर एखादा मोठा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण राहील, असा सवालही या परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ या रस्त्याची दुरु स्ती करावी व रस्त्याच्या कडेला आलेल्या झाडांच्या फांद्या व रस्त्यावर आलेल्या पालापाचोळा यांचीही साफसफाई करावी, अशी मागणी वामन दळवी, प्रकाश दळवी, त्र्यंबक दळवी, राहुरी सरपंच संगीता घुगे, संपत घुगे, ऋषीकेश घुगे, गणेश करंजकर, दिलीप जाधव, श्रावण निकम, मदन गायकवाड, कैलास यादव, अंबादास कस्तुरे, मदन घुगे, अनिल बोडकेसह शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक