शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

शहरात प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅफिक वार्डन

By admin | Updated: June 19, 2017 19:13 IST

रणजीत पाटील : नियमावली करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक शहरात वाढत्या रहदारीचे नियोजन करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत ट्रॅफिक वार्डनची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, त्यासाठी गृह विभागाला नियमावली करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आहेत. होमगार्डच्या धर्तीवर नाशिक शहरात ट्रॅफिक वार्डन (वाहतूक मदतनीस) योजना राबविण्याबाबत मंत्रालयात डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यात ठाणे व नांदेड आदी शहरांमध्ये ट्रॅफिक वार्डन हे मासिक मानधनावर वाहतूक पोलिसांना मदतीचे काम करत आहेत. नाशिक शहरातदेखील ५ सप्टेंबर २००४ रोजी पोलीस महासंचालकांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करून ट्रॅफिक वार्डन योजना सुरू केली गेली होती. त्यांना ट्रॅफिकचे नियम आणि कायदेविषयक माहितीचे ९० दिवसांचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते. मात्र २००९ नंतर ही योजना बंद करण्यात आल्याची बाब आमदार जयंत जाधव यांनी निदर्शनास आणून दिली. नाशिक शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या व वेगाने वाढणारी वाहनांची संख्या याचा विचार करून वाहतुकीच्या नियमनासाठी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली. त्यावर डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले की, अमृत शहर अभियान आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असणाऱ्या सर्व शहरांमध्ये ट्रॅफिक वार्डनची सेवा देता येणे शक्य आहे. त्यासाठी गृह विभागाकडून नियमावली तयार करण्यात येईल. तत्पूर्वी नाशिक शहरात प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅफिक वार्डनची योजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (परिवहन) आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त (परिवहन) अमिताभ कुमार, अतिरिक्त महामार्ग पोलीस आयुक्त विजय पाटील, महाराष्ट्र ट्रॅफिक वार्डन असोसिएशनचे समन्वयक संतोष शेलार आदी उपस्थित होते.