शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रस्त्यात झाडे पडल्याने वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:39 IST

सायखेडा:गोदाकाठ भागात चार दिवस पुराच्या पाण्याने वेढलेली गावे आणि अनेक वाहून गेलेले संसार यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होत.े

सायखेडा:गोदाकाठ भागात चार दिवस पुराच्या पाण्याने वेढलेली गावे आणि अनेक वाहून गेलेले संसार यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होत.े मंगळवारी सकाळी दहा वाजता पुराचे पाणी कमी झाले असले तरी सखोल भागात आणि नदी लगतच्या भागात मात्र पाणी कायम आहे, सायखेडा चांदोरी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे, झाडे कापण्याचे काम सायंकाळ पर्यंत सुरु होते.सहा दिवस नाशिक जिल्ह्यात सुरु असलेला पाऊस आणि सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने सुरु असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ होऊन गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी,चाटोरी, शिंगवे, चापडगाव, दारणसांगवी, शिंपीटाकळी, नागापूर, मांजरगाव या गावांना महापूर येऊन सलग तीन दिवस गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. तर शेकडो लोकांचे स्थलांतर केले होते शिवाय हजरो लोक गावातील घरात, मजल्यावर अडकले होते , जनजीवन विस्कळीत होऊन सगळीकडे पूर परिस्थितीमुळे हाल झाले होते, चांदोरी येथे महामार्ग बंद झाला होता तर सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी पडत असल्याने सलग तिसर्या दिवशी वाहतूक बंद करण्यात आली होती, दुपार नंतर पुलावरचे पाणी कमी झाले असले तरी रस्त्यावरील झाडे पडल्याने वाहतूक बंद होती, रस्त्यावर ,घरात, अनेक शॉपिंग सेंटर, मॉल, दुकाने, बसस्थानक, या ठिकाणी तीन ते चार फूट गाळ साचल्याने कुठेही प्रवास करणे शक्य नव्हते

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूर