शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

शहरात बेशिस्त वाहतुकीने कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:57 IST

नाशिक : कोरोनामुळे लादलेले निर्बंध शिथिल केल्याने सोमवारपासून शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली असून, रस्त्यावरील स्वयंचलित सिग्नल बंद असल्यामुळे बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्त्यावर त्यामुळे लहान-मोठे अपघात तसेच वादविवादाच्या घटना घडू लागल्या आहेत.

नाशिक : कोरोनामुळे लादलेले निर्बंध शिथिल केल्याने सोमवारपासून शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली असून, रस्त्यावरील स्वयंचलित सिग्नल बंद असल्यामुळे बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्त्यावर त्यामुळे लहान-मोठे अपघात तसेच वादविवादाच्या घटना घडू लागल्या आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २३ मार्च पासून लॉकडाउन व संचारबंदी जारी केल्याने अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव करण्यात आला होता, त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गावरील वाहतूक थंडावून रस्ते सामसूम झाले होते, रस्त्यावर वाहनच नसल्याने शहर वाहतूक शाखेने स्वयंचलित सिग्नल यंत्रणाही बंद केली, एरवी वाहनांची गर्दी, हॉर्नच्या गोंगाटाने गजबजून जाणारे रस्ते जवळपास एक महिनाभर शांत झाले होते. तथापि, लॉकडाउनचा तिसऱ्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी शिथिल केली, त्याचबरोबर लहान-मोठे उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची अनुमती दिली, परिणामी जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होऊन रस्त्यावर मोजके वाहने धावू लागली होती. आता मात्र सरकारने अनलॉक जाहीर केल्यामुळे मोठ्या प्रमावर नागरिक घराबाहेर पडू लागले असून, प्रत्येकालाच घाई असल्यागत वाहने रस्त्यावर दामटवली जात असल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची व वाहनांची कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा सर्व परिस्थितीत शहर वाहतुकीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलिसांचे मात्र रस्त्यावर कोठेही अस्तित्व जाणवत नाही.-------------------------बेशिस्त वाहतूक, त्यात अडथळ्यांची भरशहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले असताना त्यात पोलीस यंत्रणेने अनेक मार्गावर कोरोनाच्या निमित्ताने अडथळे उभे केले आहेत, काही रस्ते अंशत: खुली आहेत तर काही पूर्ण बंद आहेत, त्यामुळेदेखील अन्य पयार्यी रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडून त्यातून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण घडत आहे. शहर जर सरकारच्या आदेशाने व्यवसाय व उद्योगासाठी खुले केले आहे तर रस्ते कोणाच्या आदेशाने बंद आहेत, असा सवाल केला जात आहे.--------------------------शिस्तीची गरजवाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम भंग होत असल्याने त्यातून लहान-मोठे अपघात, वाहनचालकांची हमरीतुमरीच्या घटना घडू लागल्या आहेत. हा सारा प्रकार शहरातील प्रत्येक रस्त्यावर घडत असताना मात्र रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही. सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून, काही चालक सुसाट वेगाने वाहन हाकत आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक