शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:17 IST

शहरातून जाणारा मनमाड-अहमदनगर राज्य महामार्गासह येथील विंचूर चौफुलीवर वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देचिंता : विंचूर चौफुलीवर वाहनांच्या रांगा; लग्नसराईमुळे पडली भर; सिग्नलची मागणी

येवला : शहरातून जाणारा मनमाड-अहमदनगर राज्य महामार्गासह येथील विंचूर चौफुलीवर वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली असून, वाहतूक कोंडीचे शहर म्हणून येवल्याची ओळख होऊ लागली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावरील येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर कायम वाहतूक कोंडी होत आहे, तर विंचूर चौफुली व फत्तेबुरुज नाका येथे सकाळी १० वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने येवला-विंचूर चौफुलीवरील वाहतुकीच्या कोंडीत सापडत आहे. त्यातच शहरात लावलेल्या अभिनंदनाच्या फलकांचा अडथळा होत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. प्रवासी आणि मालवाहतूक गाड्याही येथेच उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.शहरातील तीनही चौफुलींवर २४ तास वाहतूक पोलिसांनी नेमणूक आवश्यक आहे. अतिक्र मणाच्या मोहिमेत पोलीस चौकी जमीनदोस्त झाल्याने पोलिसांना येथे जागा नाही. त्यामुळे चौफुकीवर पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी फोडण्यास वेळ लागतो. यामुळे अनेक वाहनधारकांमध्ये वाद होतात.या वाहतुकीच्या कोंडीतून येवलेकरांची सुटका कोण करणार, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. रास्ता रोको आंदोलनासाठी वापरल्या जाणाऱ्या येवला-विंचूर चौफुलीवर राजकीय धुरिणांनी लक्ष घालून वाहतूक सिग्नल बसविण्यासाठी एकत्र येण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष४येवला-विंचूर चौफुलीवर वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारणीची जुनी मागणी आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. चौफुलीवर मध्यभागी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शेड नसल्याने पोलीस येथे वाहतूक नियमनासाठी उभे राहू शकत नाही.विंचूर चौफुलीसह प्रमुख मार्गावर सिग्नल बसवावेत. यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल आणि वाहतूक सुरळीत राहील. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.- सुधाकर पाटोळेवाहन चालक-मालक संघटना

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी