शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

वाहतूक कोंडीचे खापर मनपाच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:13 IST

मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे.

ठळक मुद्देवाहतूक शिस्त जबाबदारी कुणाची? : पोलीस आयुक्तांनी मांडल्या वाहतुकीच्या समस्या

नाशिक : मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे.नियोजन समितीमध्ये शहरातील पोलीस यंत्रणेच्या सादरीकरण दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी वाहतूक कोंडीला केवळ पोलीस यंत्रणा जबाबदार नाही तर शहराच्या नियोजनदेखील असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.१९ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी केवळ अडीचशे वाहतूक पोलीस पुरेसे नाहीत. ट्रॅफिक वॉर्डन देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला तर सिग्नलवरी यंत्रणा सुरळीत करता येऊ शकेल. एकट्या द्वारका चौकात सहा वाहतूक पोलीस द्यावे लागतात याकडेदेखील लक्ष वेधले.शहरात रिक्षांची आवश्यकता केवळ १२ हजारांपर्यंतच आहे, परंतु २३ हजारांपेक्षा अधिक रिक्षा धावतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना आपली वाहने वापरावी लागतात, असा दावा पोलीस आयुक्तांना केला आहे.वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या कोंडीला मनपाचे नियोजन जबाबदार असल्याकडेच पोलीस आयुक्तांनी बोट दाखविले.उपाययोजना करण्याची सूचनासादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी वाहतूक सुरक्षिततेसबाबतचा मुद्दा उपस्थित करताना स्मार्ट सिटीतून सुरक्षिततेसाठीच्या उपायोजना करण्याचीदेखील सूचना केल्याने महापालिकेनेच आता वाहतूक नियंत्रणाची जबादारी पार पाडावी असा अर्थ त्यातून काढला जात असेल तर मग पोलीस यंत्रणा नेमके काय करणार अशी चर्चा होऊ लागली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस