शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घाट रुंदीकरणासह बायपासचे काम रखडल्याने वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

पेठ (एस.आर. शिंदे) : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक ते पार्डी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ...

पेठ (एस.आर. शिंदे) : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक ते पार्डी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ पेठ तालुक्यातून जात असून या महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कोटंबी व सावळघाटातील रुंदीकरण व पेठ शहरातून जाणारा बायपासचे काम रखडल्यामुळे चांगला रस्ता असूनही वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक मात्र चांगलेच हैराण झाले आहेत.

सध्या पावसाचे दिवस असल्याने सावळघाटातून अवजड वाहने प्रवास करताना अरुंद रस्ता व धोकादायक वळणांमुळे वारंवार अपघात होत आहेत. तर मोठे ट्रेलर अडकल्यामुळे पाच-पाच तास वाहतुकीचा खोळंबा होताना दिसून येतो. घाटातील अवघड वळणावर संरक्षक कठडे नसल्याने चालकाचा ताबा सुटून वाहने थेट दरीत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशीच काहीसी परिस्थिती कोटंबी घाटात झाली आहे. तीव्र उतार आणी अवघड वळणांमुळे वाहने समोरासमोर टक्कर होत आहेत. पेठ शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हट्टीपाडा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

------------------------------

बायपासअभावी पेठ शहरात कोंडी

गुजरात राष्ट्रीय महामार्ग पेठ शहरातून जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक दुकाने व दररोजची ग्राहकांची गर्दी यामुळे अवजड वाहनांना शहरातून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत बायपास मंजूर असला तरी मशिनरी आणून ठेवण्यापलीकडे बायपासच्या कामाची कोणतीही प्रगती दिसून येत नसल्याने प्रवाशांसह व्यावसायिकांनाही वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

करंजाळी ते हरसूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

करंजाळी व हरसूल या दोन महत्त्वाच्या बाजारपेठेच्या गावांना जोडणारा रस्ता गत अनेक वर्षांपासून दुरुस्ती व रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत असून या मार्गावरून प्रवास करताना वाहनासह प्रवाशांचे ही हाडे खिळखिळे झाल्याशिवाय राहत नाही. करंजाळीपासून कोहोर, घनशेत, कुळवंडी, जातेगाव ही मोठी गावे असून प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आश्रमशाळाही याच मार्गावर असल्याने रुग्णांची वाहतूक करतानाही कसरत करावी लागते. याच रस्त्यावर असलेल्या छोट्या फरशी पुलांवरून पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने करंजाळी ते हरसूल रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

-----------------------

दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले

पावसाळ्यात अनेक घाटांमध्ये धोकादायक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून संरक्षक कठड्यांसह उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. पेठ ते भुवन, पेठ ते अंधृटे, सावर्णा ते झरी, बाडगी ते डेरापाडा, म्हसगण ते आंबे, पिंपळपाडा ते विरमाळ, दोनावडेचा घाट आदी ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळून रस्त्यावर दगड येत असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होताना दिसून येतात. (२१ पेठ रस्ता)

210821\21nsk_1_21082021_13.jpg

२१ पेठ रस्ता