शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

वाहतूकदारांची दांडी; विद्यार्थ्यांची कोंडी

By admin | Updated: February 1, 2017 01:44 IST

चक्का जाम : वाहतूकसेवा ठप्प; ज्येष्ठ नागरिकांचे हाल

 नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ सार्वजनिक खासगी वाहतूक दारांसह मालवाहतूकदारांनी चक्का जाम आंदोलन केल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. सकाळी ११ वाजेपासून चक्का जाम आंदोलनाचा प्रभाव शहरातील विविध रस्त्यांवर पहावयास मिळत होता. सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा वाहतूकदारांनी वाहतूक सेवा बंद केली होती. त्यामुळे रस्त्यांवर रिक्षा नजरेस पडत नव्हत्या. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागला. सकाळी रिक्षा व ओम्नीवाल्या ‘काकां’च्या वाहनाचा हॉर्न बहुतांश नाशिककरांच्या कानी पडलाच नाही. (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रिक्षा थांब्यांसह उपनगरीय भागातील रिक्षा थांबेही ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळत होते. त्यामुळे बस थांब्यांवर प्रवासी बसेसच्या प्रतीक्षेत मोठ्या संख्येने उभे होते. बसेसच्या सर्व फेऱ्या सुरळीत सुरू होत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रवाशांना मात्र बसेससाठी विविध मार्गांवरील थांब्यावर प्रतीक्षाच करत ताटकळत रहावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली, तर काही विद्यार्थ्यांनी थांब्यावर थांबून वेळ वाया घालविण्यापेक्षा पायीच शाळा - महाविद्यालयाचा रस्ता धरणे पसंत केले. प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाढविण्यात आलेल्या करवाढीच्या निषेधार्थ सार्वजनिक खासगी शालेय वाहतूकदारांनीदेखील मंगळवारी (दि.३१) ‘दांडी’ मारली. यामुळे सकाळी रिक्षा व ओम्नीवाल्या ‘काकां’च्या वाहनाचा हॉर्न बहुतांश नाशिककरांच्या कानी पडलाच नाही. पालकांनी लवकर तयार होऊन आपल्या पाल्यांना शाळेमध्ये स्वत:च्या वाहनांमधून दाखल केले. ज्या सर्वसामान्य नागरिकांकडे दुचाकी आहे त्यांचे हाल झाले. त्यांना एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दुचाकीवरून शाळेत पोहचवावे लागले. तसेच ज्या नागरिकांकडे वाहने नाही त्यांच्या पाल्यांनाही काही नागरिकांनी शेजारधर्म पाळत शाळांमध्ये नेऊन सोडले. वडाळागावातील नागरिकांना शहरात येण्यासाठी केवळ रिक्षांचा आधार आहे. कारण या गावापर्यंत अद्याप महामंडळाला बससेवा देणे शक्य झालेले नाही. चक्का जाममुळे गावातील सर्वसामान्य नागरिक दुपारनंतरच शहराकडे आले. इन्फो... ज्येष्ठ नागरिकांनादेखील चक्का जाम आंदोलनामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. भर उन्हात बसची वाट बघत थांब्यावर ताटकळत उभे रहावे लागले. रिक्षादेखील उपलब्ध होत नसल्यामुळे ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी काही ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाण्याचे नियोजन केले असताना मात्र त्यांना संध्याकाळी भेटीची वेळ निश्चित करावी लागली. कारण सकाळच्या सुमारास रिक्षा बंद होत्या. दुपारी २ वाजेनंतर शहरातील रस्त्यांवर रिक्षा धावताना दिसून आल्या. फोटो- ३१पीएचजेअ‍े -७२/७३/७४/७५