शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

वाहतूकदारांची दांडी; विद्यार्थ्यांची कोंडी

By admin | Updated: February 1, 2017 01:44 IST

चक्का जाम : वाहतूकसेवा ठप्प; ज्येष्ठ नागरिकांचे हाल

 नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ सार्वजनिक खासगी वाहतूक दारांसह मालवाहतूकदारांनी चक्का जाम आंदोलन केल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. सकाळी ११ वाजेपासून चक्का जाम आंदोलनाचा प्रभाव शहरातील विविध रस्त्यांवर पहावयास मिळत होता. सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा वाहतूकदारांनी वाहतूक सेवा बंद केली होती. त्यामुळे रस्त्यांवर रिक्षा नजरेस पडत नव्हत्या. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागला. सकाळी रिक्षा व ओम्नीवाल्या ‘काकां’च्या वाहनाचा हॉर्न बहुतांश नाशिककरांच्या कानी पडलाच नाही. (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रिक्षा थांब्यांसह उपनगरीय भागातील रिक्षा थांबेही ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळत होते. त्यामुळे बस थांब्यांवर प्रवासी बसेसच्या प्रतीक्षेत मोठ्या संख्येने उभे होते. बसेसच्या सर्व फेऱ्या सुरळीत सुरू होत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रवाशांना मात्र बसेससाठी विविध मार्गांवरील थांब्यावर प्रतीक्षाच करत ताटकळत रहावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली, तर काही विद्यार्थ्यांनी थांब्यावर थांबून वेळ वाया घालविण्यापेक्षा पायीच शाळा - महाविद्यालयाचा रस्ता धरणे पसंत केले. प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाढविण्यात आलेल्या करवाढीच्या निषेधार्थ सार्वजनिक खासगी शालेय वाहतूकदारांनीदेखील मंगळवारी (दि.३१) ‘दांडी’ मारली. यामुळे सकाळी रिक्षा व ओम्नीवाल्या ‘काकां’च्या वाहनाचा हॉर्न बहुतांश नाशिककरांच्या कानी पडलाच नाही. पालकांनी लवकर तयार होऊन आपल्या पाल्यांना शाळेमध्ये स्वत:च्या वाहनांमधून दाखल केले. ज्या सर्वसामान्य नागरिकांकडे दुचाकी आहे त्यांचे हाल झाले. त्यांना एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दुचाकीवरून शाळेत पोहचवावे लागले. तसेच ज्या नागरिकांकडे वाहने नाही त्यांच्या पाल्यांनाही काही नागरिकांनी शेजारधर्म पाळत शाळांमध्ये नेऊन सोडले. वडाळागावातील नागरिकांना शहरात येण्यासाठी केवळ रिक्षांचा आधार आहे. कारण या गावापर्यंत अद्याप महामंडळाला बससेवा देणे शक्य झालेले नाही. चक्का जाममुळे गावातील सर्वसामान्य नागरिक दुपारनंतरच शहराकडे आले. इन्फो... ज्येष्ठ नागरिकांनादेखील चक्का जाम आंदोलनामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. भर उन्हात बसची वाट बघत थांब्यावर ताटकळत उभे रहावे लागले. रिक्षादेखील उपलब्ध होत नसल्यामुळे ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी काही ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाण्याचे नियोजन केले असताना मात्र त्यांना संध्याकाळी भेटीची वेळ निश्चित करावी लागली. कारण सकाळच्या सुमारास रिक्षा बंद होत्या. दुपारी २ वाजेनंतर शहरातील रस्त्यांवर रिक्षा धावताना दिसून आल्या. फोटो- ३१पीएचजेअ‍े -७२/७३/७४/७५