शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाहतूकदारांची दांडी; विद्यार्थ्यांची कोंडी

By admin | Updated: February 1, 2017 01:44 IST

चक्का जाम : वाहतूकसेवा ठप्प; ज्येष्ठ नागरिकांचे हाल

 नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ सार्वजनिक खासगी वाहतूक दारांसह मालवाहतूकदारांनी चक्का जाम आंदोलन केल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. सकाळी ११ वाजेपासून चक्का जाम आंदोलनाचा प्रभाव शहरातील विविध रस्त्यांवर पहावयास मिळत होता. सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा वाहतूकदारांनी वाहतूक सेवा बंद केली होती. त्यामुळे रस्त्यांवर रिक्षा नजरेस पडत नव्हत्या. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागला. सकाळी रिक्षा व ओम्नीवाल्या ‘काकां’च्या वाहनाचा हॉर्न बहुतांश नाशिककरांच्या कानी पडलाच नाही. (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रिक्षा थांब्यांसह उपनगरीय भागातील रिक्षा थांबेही ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळत होते. त्यामुळे बस थांब्यांवर प्रवासी बसेसच्या प्रतीक्षेत मोठ्या संख्येने उभे होते. बसेसच्या सर्व फेऱ्या सुरळीत सुरू होत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रवाशांना मात्र बसेससाठी विविध मार्गांवरील थांब्यावर प्रतीक्षाच करत ताटकळत रहावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली, तर काही विद्यार्थ्यांनी थांब्यावर थांबून वेळ वाया घालविण्यापेक्षा पायीच शाळा - महाविद्यालयाचा रस्ता धरणे पसंत केले. प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाढविण्यात आलेल्या करवाढीच्या निषेधार्थ सार्वजनिक खासगी शालेय वाहतूकदारांनीदेखील मंगळवारी (दि.३१) ‘दांडी’ मारली. यामुळे सकाळी रिक्षा व ओम्नीवाल्या ‘काकां’च्या वाहनाचा हॉर्न बहुतांश नाशिककरांच्या कानी पडलाच नाही. पालकांनी लवकर तयार होऊन आपल्या पाल्यांना शाळेमध्ये स्वत:च्या वाहनांमधून दाखल केले. ज्या सर्वसामान्य नागरिकांकडे दुचाकी आहे त्यांचे हाल झाले. त्यांना एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दुचाकीवरून शाळेत पोहचवावे लागले. तसेच ज्या नागरिकांकडे वाहने नाही त्यांच्या पाल्यांनाही काही नागरिकांनी शेजारधर्म पाळत शाळांमध्ये नेऊन सोडले. वडाळागावातील नागरिकांना शहरात येण्यासाठी केवळ रिक्षांचा आधार आहे. कारण या गावापर्यंत अद्याप महामंडळाला बससेवा देणे शक्य झालेले नाही. चक्का जाममुळे गावातील सर्वसामान्य नागरिक दुपारनंतरच शहराकडे आले. इन्फो... ज्येष्ठ नागरिकांनादेखील चक्का जाम आंदोलनामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. भर उन्हात बसची वाट बघत थांब्यावर ताटकळत उभे रहावे लागले. रिक्षादेखील उपलब्ध होत नसल्यामुळे ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी काही ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाण्याचे नियोजन केले असताना मात्र त्यांना संध्याकाळी भेटीची वेळ निश्चित करावी लागली. कारण सकाळच्या सुमारास रिक्षा बंद होत्या. दुपारी २ वाजेनंतर शहरातील रस्त्यांवर रिक्षा धावताना दिसून आल्या. फोटो- ३१पीएचजेअ‍े -७२/७३/७४/७५