इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनामुळे होणाºया वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी सदर रस्ता लॉन्स व मंगल कार्यासाठी असून, वाहतुकीसाठी नाही, असा फलक लावण्याची उपरोधक मागणी केली आहे.सुमारे पंधरा वर्षांत दोन टप्प्यांत वडाळानाका ते पाथर्डीगाव, असा वडाळा-पाथर्डी नागपूर पॅटर्नचा रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्त्या करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूस व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर पक्के बांधलेले ओटे आणि पत्र्याचे शेड हे रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले तसेच वाहनांवर नियंत्रण राहावे आणि समोरासमोर अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. त्या दुभाजकांमध्ये खजूर व शोभिवंत वृक्ष लावण्यात आल्याने रस्त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे.या संदर्भात संबंधित विभागाला निवेदन आणि समक्ष भेटून तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.वाहने रस्त्यावरचया रस्त्यालगतच दहा ते बारा लॉन्स व मंगल कार्यालये उभी राहिली असून, त्यांच्याकडे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने ज्या दिवशी विवाह सोहळा असतो त्यादिवशी रस्त्यावरच तासन तास लहान, मोठी वाहने उभी राहतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांना आणि रस्त्यालगत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच अनेक वेळेस लहान-मोठे अपघात घडतात.
वडाळा-पाथर्डी रस्त्यावर लॉन्समुळे वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:56 IST