शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

गावगाड्यातील पारंपरिक व्यवसाय ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:42 IST

येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने लागू केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीचा फटका अनेक परंपरागत व्यवसायावर उपजीविका भागवणाऱ्या कारागीर, मजुरांना बसला आहे.

येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने लागू केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीचा फटका अनेक परंपरागत व्यवसायावर उपजीविका भागवणाऱ्या कारागीर, मजुरांना बसला आहे. लॉकडाउनने अनेक पारंपरिक व्यवसाय ‘लॉक’ झाले. परिणामी पारंपरिक कारागीर बेरोजगार झाले आहेत. गावगाड्यातील अत्यावश्यक घटक ठरलेला नाभिक समाजाचा रोजगार तर निकटचा संपर्क म्हणून कोरोनाने ठप्प झाला आहे.सामान्यत: घरच्या घरी दाढी स्वत:च्या हाताने करणे शक्य असले, तरी केस कापणे कठीण काम आहे. उच्च शिक्षित वर्गासोबतच सर्वसामान्य वर्गही केसकर्तनासाठी नाभिक कारागिरांवरच अवलंबून असतो. पूर्वी नाभिक कारागीर दाढी व केशकर्तनाचे साहित्य एका पेटी अथवा थैल्यातून घेऊन घरपोहोच दाढी-केशकर्तन सेवा द्यायचे. छोट्या-छोट्या गावांमध्ये तर पारावरच दुकान मांडले जायची. या मोबदल्यात वर्षाकाठी धान्य मिळायचे, कालांतराने हा मोबदला महिन्याकाठी आला. नंतर रोखीने पैसे मिळू लागले. या बदलाबरोबरच सलून व्यवसायही आधुनिक झाला. अद्यावत तंंत्र व यंत्रही या व्यवसायात आले. शहरासह ग्रामीण भागात शेकडो कारागीर नाभिक व्यवसायावर आपली उपजीविका चालवतात.येवला शहर व तालुक्याचा विचार केला तर साडेचारशेच्या आसपास नाभिक कारागीर-व्यावसायिकांची दुकाने आहेत. या व्यवसायात किमान दुप्पट कारागीर आहे. कोरोनाच्या लॉकडाउनने ही सगळी व्यावसायिक-कारागीर मंडळी बेरोजगार झाली आहेत. लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू असला तरी शासनाकडून नाभिक व्यावसायिकांची दुकाने काही खुली झालेली नाही. दाढी-केशकर्तन साहित्याचे निर्जंतुकीकरण केले तरी संसर्गाचा धोका टळत नाही, कारण ग्राहकांच्या शरीराला प्रत्यक्ष स्पर्श करावाच लागतो. एकीकडे बेरोजगारी व दुसरीकडे संसर्गाचा धोका, अशा द्विधा-मन:स्थितीत सलून व्यावसायिक आहेत. परिणामी दुकाने लॉकडाउन असली तरी घरपोच सेवादेखील या कारागीर - व्यावसायिकांकडून दिली जात नाही.उपासमारीची वेळकोरोना महामारीने नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय ठप्प झाल्याने नाभिक व्यावसायिक व कारागीर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाजाच्या अनेक तरु णांनी बँक-पतपेढ्यांकडून कर्ज घेऊन, काहींनी पाहुण्या रावळ्यांकडून उधार उसनवारी करून व्यवसाय सुरू केले होते. त्यांच्यापुढे पोटापाण्याबरोबरच रोजगार बुडाल्याने बँक-पतपेढ्यांची देणी कशी चुकती करायची हा प्रश्न आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या नाभिक व्यावसायिक-कारागिरांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी नाभिक समाजातून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक