शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

गावगाड्यातील पारंपरिक व्यवसाय ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:42 IST

येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने लागू केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीचा फटका अनेक परंपरागत व्यवसायावर उपजीविका भागवणाऱ्या कारागीर, मजुरांना बसला आहे.

येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने लागू केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीचा फटका अनेक परंपरागत व्यवसायावर उपजीविका भागवणाऱ्या कारागीर, मजुरांना बसला आहे. लॉकडाउनने अनेक पारंपरिक व्यवसाय ‘लॉक’ झाले. परिणामी पारंपरिक कारागीर बेरोजगार झाले आहेत. गावगाड्यातील अत्यावश्यक घटक ठरलेला नाभिक समाजाचा रोजगार तर निकटचा संपर्क म्हणून कोरोनाने ठप्प झाला आहे.सामान्यत: घरच्या घरी दाढी स्वत:च्या हाताने करणे शक्य असले, तरी केस कापणे कठीण काम आहे. उच्च शिक्षित वर्गासोबतच सर्वसामान्य वर्गही केसकर्तनासाठी नाभिक कारागिरांवरच अवलंबून असतो. पूर्वी नाभिक कारागीर दाढी व केशकर्तनाचे साहित्य एका पेटी अथवा थैल्यातून घेऊन घरपोहोच दाढी-केशकर्तन सेवा द्यायचे. छोट्या-छोट्या गावांमध्ये तर पारावरच दुकान मांडले जायची. या मोबदल्यात वर्षाकाठी धान्य मिळायचे, कालांतराने हा मोबदला महिन्याकाठी आला. नंतर रोखीने पैसे मिळू लागले. या बदलाबरोबरच सलून व्यवसायही आधुनिक झाला. अद्यावत तंंत्र व यंत्रही या व्यवसायात आले. शहरासह ग्रामीण भागात शेकडो कारागीर नाभिक व्यवसायावर आपली उपजीविका चालवतात.येवला शहर व तालुक्याचा विचार केला तर साडेचारशेच्या आसपास नाभिक कारागीर-व्यावसायिकांची दुकाने आहेत. या व्यवसायात किमान दुप्पट कारागीर आहे. कोरोनाच्या लॉकडाउनने ही सगळी व्यावसायिक-कारागीर मंडळी बेरोजगार झाली आहेत. लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू असला तरी शासनाकडून नाभिक व्यावसायिकांची दुकाने काही खुली झालेली नाही. दाढी-केशकर्तन साहित्याचे निर्जंतुकीकरण केले तरी संसर्गाचा धोका टळत नाही, कारण ग्राहकांच्या शरीराला प्रत्यक्ष स्पर्श करावाच लागतो. एकीकडे बेरोजगारी व दुसरीकडे संसर्गाचा धोका, अशा द्विधा-मन:स्थितीत सलून व्यावसायिक आहेत. परिणामी दुकाने लॉकडाउन असली तरी घरपोच सेवादेखील या कारागीर - व्यावसायिकांकडून दिली जात नाही.उपासमारीची वेळकोरोना महामारीने नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय ठप्प झाल्याने नाभिक व्यावसायिक व कारागीर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाजाच्या अनेक तरु णांनी बँक-पतपेढ्यांकडून कर्ज घेऊन, काहींनी पाहुण्या रावळ्यांकडून उधार उसनवारी करून व्यवसाय सुरू केले होते. त्यांच्यापुढे पोटापाण्याबरोबरच रोजगार बुडाल्याने बँक-पतपेढ्यांची देणी कशी चुकती करायची हा प्रश्न आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या नाभिक व्यावसायिक-कारागिरांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी नाभिक समाजातून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक