शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

नांदूरशिंगोटे येथील बाजारात १३ आठवड्यांपासून व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:29 IST

नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामपंचायतींना लाखो रुपयांच्या करवसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. तालुक्यातील दहा ते बारा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आठवडे बाजार १३ आठवड्यांपासून ठप्प असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठ व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर झाला आहे.

नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामपंचायतींना लाखो रुपयांच्या करवसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. तालुक्यातील दहा ते बारा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आठवडे बाजार १३ आठवड्यांपासून ठप्प असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठ व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर झाला आहे. देशात व राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद करण्यातआली आहेत. गावोगावी भरणारे आठवडे बाजार पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आले आहेत.सिन्नर तालुक्यातील ठाणगाव, दापूर, चास, नांदूरशिंगोटे, गुळवंच, पंचाळे, वावी, पाथरे बुद्रुक, वडांगळी, शहा, नायगाव, सोमठाणे आदी बारा गावांत आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी बाजार भरत असतो. आठवडे बाजाराच्या माध्यमातून काही ग्रामपंचायतींना लिलावाच्या माध्यमातून करवसुली करतात. या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूल ग्रामपंचायतींना मिळतो.या निधीच्या माध्यमातून विकासाची कामे ग्रामपंचायतींना करता येतात. मात्र लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार भरले नाही. त्यामुळे करवसुलीवर ग्रामपंचायतीला पाणी सोडावे लागले.------------------स्थानिक व्यावसायिकांना फटकानांदूरशिंगोटेचा दर शुक्र वारी आठवडे बाजार असतो. तसेच त्याच दिवशी येथील उपबाजारात कांद्याचा व धान्य, भुसार मालाची खरेदी-विक्र ी केली जाते. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने पंधरा ते वीस गावांचा येथे बाजाराच्या निमित्ताने संपर्क असतो. येथील आठवडे बाजारात दर शुक्र वारी लाखो रु पयांची उलाढाल होते. परिसरातील ग्राहक येथे बाजारासाठी येत असतात; पंरतु गेल्या तीन महिन्यांपासून आठवडे बाजार बंद असल्याने त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांनाही बसला आहे. अद्यापही छोटे-मोठे दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत गर्दी कमी आहे.नांदूरशिंगोटे येथील आठवडे बाजाराचा लिलाव दरवर्षी चढ्या दराने जात होता. दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव केला जात होता. परंतु यावर्षी कोरोनामुळे लिलाव करण्याची वेळच आली नाही. लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार बंद झाला. परंतु गावातील काही आस्थापना बंद असल्याने त्याच्या पट्ट्या येणे बंद झाले आहे. मध्यंतरी लोकांना रोजगार नसल्याने घर व पाणीपट्टी वसुली होत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nashikनाशिक