शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

नांदूरशिंगोटे येथील बाजारात १३ आठवड्यांपासून व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:29 IST

नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामपंचायतींना लाखो रुपयांच्या करवसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. तालुक्यातील दहा ते बारा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आठवडे बाजार १३ आठवड्यांपासून ठप्प असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठ व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर झाला आहे.

नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामपंचायतींना लाखो रुपयांच्या करवसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. तालुक्यातील दहा ते बारा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आठवडे बाजार १३ आठवड्यांपासून ठप्प असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठ व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर झाला आहे. देशात व राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद करण्यातआली आहेत. गावोगावी भरणारे आठवडे बाजार पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आले आहेत.सिन्नर तालुक्यातील ठाणगाव, दापूर, चास, नांदूरशिंगोटे, गुळवंच, पंचाळे, वावी, पाथरे बुद्रुक, वडांगळी, शहा, नायगाव, सोमठाणे आदी बारा गावांत आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी बाजार भरत असतो. आठवडे बाजाराच्या माध्यमातून काही ग्रामपंचायतींना लिलावाच्या माध्यमातून करवसुली करतात. या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूल ग्रामपंचायतींना मिळतो.या निधीच्या माध्यमातून विकासाची कामे ग्रामपंचायतींना करता येतात. मात्र लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार भरले नाही. त्यामुळे करवसुलीवर ग्रामपंचायतीला पाणी सोडावे लागले.------------------स्थानिक व्यावसायिकांना फटकानांदूरशिंगोटेचा दर शुक्र वारी आठवडे बाजार असतो. तसेच त्याच दिवशी येथील उपबाजारात कांद्याचा व धान्य, भुसार मालाची खरेदी-विक्र ी केली जाते. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने पंधरा ते वीस गावांचा येथे बाजाराच्या निमित्ताने संपर्क असतो. येथील आठवडे बाजारात दर शुक्र वारी लाखो रु पयांची उलाढाल होते. परिसरातील ग्राहक येथे बाजारासाठी येत असतात; पंरतु गेल्या तीन महिन्यांपासून आठवडे बाजार बंद असल्याने त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांनाही बसला आहे. अद्यापही छोटे-मोठे दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत गर्दी कमी आहे.नांदूरशिंगोटे येथील आठवडे बाजाराचा लिलाव दरवर्षी चढ्या दराने जात होता. दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव केला जात होता. परंतु यावर्षी कोरोनामुळे लिलाव करण्याची वेळच आली नाही. लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार बंद झाला. परंतु गावातील काही आस्थापना बंद असल्याने त्याच्या पट्ट्या येणे बंद झाले आहे. मध्यंतरी लोकांना रोजगार नसल्याने घर व पाणीपट्टी वसुली होत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nashikनाशिक