शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

मौजे सुकेणेत युवा शेतकऱ्याची कांदा अन् गव्हाची विषमुक्त शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST

कसबे सुकेणे (योगेश सगर) : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील मौजे सुकेणेतील श्याम मोगल या ...

कसबे सुकेणे (योगेश सगर) : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील मौजे सुकेणेतील श्याम मोगल या युवा शेतकऱ्याच्या विषमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिल्ह्यासह राज्यात कुतुहूल आणि नावीन्यपूर्ण विषय ठरत आहे. गहू, कांद्यासह अत्यंत जोखमीचे आणि नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असलेले द्राक्षही विषमुक्त पद्धतीने हा शेतकरी पिकवित असून त्यांच्या विषमुक्त उन्हाळ कांद्याला नुकताच पिंपळगाव बाजार समितीत २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला आहे. मौजे सुकेणे येथील श्याम मोगल हे १९ एकर क्षेत्रावर गेल्या १० वर्षांपासून विषमुक्त शेती करत आहे. मोगल हे पदवीधर शेतकरी आहेत. आधुनिक जीवन शैलीत माणसाची आयुर्मान का कमी झाले, या सारख्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मोगल यांनी विषमुक्त शेतीचा प्रयोग त्यांच्या शेतीत राबविला. यासाठी त्यांनी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांची प्रेरणा घेत १० वर्षांपासून नैसर्गिक विषमुक्त शेतीस प्रारंभ केला. प्रगत शेतीची वाट धरताना रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापरामुळे विषयुक्त झालेल्या शेतीस विषमुक्त करण्यास मोगल यांना तीन वर्ष लागली. विषमुक्त शेती करताना त्यांनी कांदा, गहू यावर कुठलेही रासायनिक खते, द्रवे, कीटकनाशके, बुरशीनाशकांचा वापर केला नाही. पीक क्षेत्रानुसार प्रमाण करून देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ आणि डाळींचे पीठ, १०० वर्ष वयाच्या वडाच्या झाडाखाली पडलेल्या पक्ष्यांच्या विष्टेची अमृत माती यांचे मिश्रित द्रावण चार दिवस भिजवून तयार झालेले जीवन अमृत ते शेतीत वापरत असल्याची माहिती दिली.

--------------------

कांद्याला ४ हजार २०० रुपये बाजार भाव

सध्याच्या हंगामात मोगल यांनी याच पद्धतीतून विषमुक्त कांदा पिकविला असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये बाजार समितीचे सभापती तथा आमदार दिलीप बनकर, निफाडचे प्रांताधिकारी डॉ.- अर्चना पाठारे, तहसीलदार शरद घोरपडे, डी. बी. मोगल, राजेंद्र मोगल यांच्या उपस्थितीत त्यांच्या कांद्याच्या पहिल्या बैलगाडीतील सात क्विंटल कांद्याचे वाजत-गाजत बाजार समितीच्या आवारात स्वागत झाले. या कांद्यास तब्बल ४ हजार २०० रुपये बाजार भाव मिळाला.

---------------------

आमचे पूर्वज हे विषमुक्त शेती करत. माझ्या घरातील आजी-आजोबा १००हून अधिक वर्ष निरोगी जीवन जगले. मी विषमुक्त शेतीचे धाडस केले. पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांची प्रेरणा घेत मी १० वर्षांपासून यशस्वीपणे कांदा, गहू आदींची नैसर्गिक विषमुक्त शेती करतोय - श्याम मोगल, युवा शेतकरी (०३ सुकेणे)

030721\03nsk_20_03072021_13.jpg

०३ सुकेणे १