शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

भगूरला तिरंगी लढती

By admin | Updated: November 13, 2016 23:06 IST

भगूरला तिरंगी लढती

भगूर : नगरपालिकेच्या निवडणुकीत १९ उमेदवारांनी माघार घेतल्याने नगरसेवकपदासाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ४ अपक्ष आणि तीन नगराध्यक्षपदासाठी सज्ज झाले आहेत. माघारीनंतर हे चित्र स्पष्ट होऊन अनेक दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती रंगणार आहेत. दोन ठिकाणी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला, तर एका ठिकाणी भाजपाला उमेदवारच मिळू शकलेला नसल्याचे दिसत आहे. प्रभाग १ अ हा महिला अनु. जातीसाठी राखीव असून, येथे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक स्वाती झुटे लढत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून निवडून येऊन नंतर बंडखोरी करून शिवसेनेत जाऊन त्या नगराध्यक्ष झाल्या. या बंडखोरीबद्दल उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दावा सुरू असूनही त्या उमेदवारी करत आहे, तर त्यांच्या विरुद्ध भाजपाच्या कविता जाधव या आहेत. येथे आघाडीचा उमेदवार नसल्याने दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग १ ब हा सर्वसाधारण प्रभाग असून, भाजपातर्फे विद्यमान नगरसेवक शांताराम शेटे, शिवसेनेकडून शेतकरी सोसायटी संचालक भाऊसाहेब गायकवाड, तर आघाडीतर्फे मोहम्मद अन्सारी यांच्यात तिरंगी लढती होणार आहेत. प्रभाग २ अ हा महिला अनु. जातीसाठी राखीव असून, शिवसेनेच्या अश्विनी साळवे, तर शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन गांगुर्डे यांच्या पत्नी सुवर्णा पगारे या भाजपाच्या आणि पौर्णिमा मेश्राम आघाडीतर्फे तिकिटावर लढत आहेत. येथे तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग २ ब हा सर्वसाधारण असून, येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे शिवसेनेच्या वतीने तर माजी नगराध्यक्ष भारती साळवे आघाडीतर्फे आणि प्रसाद आडके भाजपाच्या तिकिटावर लढत आहेत. प्रभाग ३ अ हा ओबीसी राखीव असून, शिवसेनेतर्फे उत्तम आहेर, तर भाजपाकडून माजी नगरसेवक सुनील जाधव आणि आघाडीच्या वतीने विशाल बलकवडे लढत आहेत. प्रभाग ३ ब हा जनरल महिलांसाठी राखीव असून, मनसेचे शहराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांच्या पत्नी जयश्री देशमुख शिवसेनेतर्फे तर सुलेभा देशमुख भाजपाच्या वतीने आणि सत्यभामा मोजाड आघाडीकडून उमेदवारी करत असून, तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग ४ अ ओबीसी राखीव असून, सुरेश वालझाडे हे शिवसेना व मधुकर कापसे भाजपा आणि योगेश लकारिया हे आघाडीतर्फे लढत आहे. प्रभाग ४ ब हा जनरल महिला राखीव असून, शकुंतला कुंडारिया (शिवसेना), लता इंदारखे (भाजपा) आणि सुरेखा मोहिते (आघाडी) तर प्राजक्त बागडे या अपक्ष असल्याने येथे चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग ५ अ हा अनु. जाती महिलांसाठी राखीव असून, संगीता पिंपळे (शिवसेना), प्रियंका पवार (भाजपा), तर शिल्पा जाधव (आघाडी) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग ५ ब हा जनरल असून, येथे काँग्रेसचे शहरप्रमुख मोहन करंजकर (आघाडी), युनूस शेख (भाजपा)े आणि संतोष ओहोळ (शिवसेना) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.