शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी

By अझहर शेख | Updated: May 29, 2023 15:10 IST

हजारो काजव्यांच्या लुकलुकण्याने अंधारात वृक्षराजी प्रकाशमान होत असून निसर्गाचा हा अद्भूत विलक्षण आविष्कार डोळ्यांत साठविण्यासाठी निसर्गप्रेमींची झुंबड उडत आहे. 

नाशिक : रात्रीच्या किर्रर्र अंधारात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील काही ठराविक वृक्षांवर काजव्यांची टिमटिम सुरू झाली  आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, मुंबई शहरांसह गुजरात राज्यातूनही पर्यटकांची पावले आता मोठ्या संख्येने कळसुबाई अभयारण्याकडे वळू लागली आहेत. पहिल्या वीकेंडलाच अभयारण्य हाउसफुल्ल झालेले पहावयास मिळाले. सुमारे सहा ते सात हजार पर्यटकांनी भेट दिल्याचा अंदाज नाशिक वन्यजीव विभागाने वर्तविला आहे. हजारो काजव्यांच्या लुकलुकण्याने अंधारात वृक्षराजी प्रकाशमान होत असून निसर्गाचा हा अद्भूत विलक्षण आविष्कार डोळ्यांत साठविण्यासाठी निसर्गप्रेमींची झुंबड उडत आहे. 

निसर्गातील दुर्मिळ होत चाललेल्या काजवा कीटकाचे अप्रूप लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. काळानुरूप शहरी भागातून हा काजवा कधीच लुप्त झाला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात काजव्याची उत्पत्ती होण्यास अभयारण्यात सुरुवात होते. येथील अर्जुनसादडा, उंबर, जांभूळ, बेहडा, हिरडा, सादडा या वृक्षांवर काजव्यांची चमचम पहावयास मिळते. काजव्यांची संख्या हळूहळू वाढण्यास सुरूवात झाली आहे. अद्याप वळवाचा पाऊस या भागात झालेला नाही. काजव्यांची संख्या कमी असली तरी ती पर्यटकांची निराशा करणारी नसल्याचे येथील स्थानिक सांगतात. निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार बघण्यासाठी शनिवारी (दि. २८) तसेच रविवारीसुद्धा मोठी गर्दी उसळली होती.

हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाहीनाशिक वन्यजीव विभागाने काजवा बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सालाबादप्रमाणे यंदाही नियमावलीची चौकट घालून दिली आहे. भंडारदरा वनपरिक्षेत्रातील शेंडी व मुतखेल या दोन तपासणी नाक्यांवरून पर्यटकांना अभयारण्यक्षेत्रात निर्धारित वेळेत सोडले जात आहे. पर्यटकांनी वेळेचे बंधन ठेवून विनाकारण वादविवाद करणे टाळावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी केले आहे.

शाश्वत निसर्ग पर्यटनावर द्यावा भरअभयारण्य क्षेत्रात रात्री काजवे बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी कुठल्याहीप्रकारे गोंगाट व गोंधळ करू नये. वन्यजीव विभागाने नेमणूक केलेल्या वाटाड्यांसह स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे, त्यांच्याशी अरेरावी करणे टाळावे. स्वयंशिस्तीने शाश्वत निसर्ग पर्यटन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे. वन्यजीव विभागाने घालून दिलेल्या १५ नियमांचे पालन अभयारण्य क्षेत्रात बंधनकारक आहे.

रात्री ९ वाजेनंतर ‘नो-एन्ट्री’अभयारण्यात काजवे बघण्यासाठी संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत यावे. रात्री ९ वाजेपासून पुढे कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही, असे नाशिक वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे. प्रति व्यक्ती, प्रति वाहन प्रवेश शुल्क वन्यजीव विभागाकडून आकारले जात आहे. तपासणी नाक्यांवर प्रवेश शुल्कावरून कोणीही वाद घालू नये, अन्यथा वन्यजीव विभागाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी दिला आहे.

पार्किंगस्थळाचा वापर आवश्यकमुतखेल, शेंडी या दोन्ही नाक्यांवरून आत प्रवेश केल्यानंतर स्थानिकांच्या घरांजवळील महसुली जागेत वन्यजीव विभागाने मोफत पार्किंगव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांनी या जागांवर वाहने उभी करून जवळच्या काजवा पॉइंटवर पायी चालत जावे. यावेळी मोबाइल टॉर्चचा केवळ रस्ता बघण्यासाठी वापर करण्यास मुभा राहील, असे वन विभागाने सांगितले आहे. अभयारण्यक्षेत्रात वाहनांचे दिवे मंद ठेवावे व अनावश्यकरित्या हॉर्न वाजवू नये, असे वनाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन