शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

एकूण १०३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 01:47 IST

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी (दि.२) दाखल झालेल्या २२ उमेदवारी अर्जांसह आतापर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे १०३ अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देनाईक शिक्षणसंस्था निवडणूक : आज गर्दी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी (दि.२) दाखल झालेल्या २२ उमेदवारी अर्जांसह आतापर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे १०३ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र याच पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी मंगळवारी अमावास्या असल्याने अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पुढे ढकला आहे. त्यामुळे बुधवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची रीघ लागण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी मंगळवारी केवळ एकच अर्ज दाखल झाला असून, विश्वस्तांच्या जागेसाठी ९, संचालकसाठी ११ व स्त्री संचालकसाठी एक अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आत्तापर्यंत तब्बल १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात रविवारी २२, सोमवारी ५७, तर मंगळवारी दाखल झालेल्या २२ अर्जांचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्र्रक्रियेत एकूण २२ अर्ज दाखल झाले असले तरी यात पदाधिकाºयांच्या जागांपैकी उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मण जायभावे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. अर्ज स्वीकृतीची मुदत बुधवारी संपणार असून, मुदत संपण्यास केवळ एक दिवस शिल्लक असतानाही मंगळवारी के वळ अमावास्या असल्यामुळे पदाधिकाºयांच्या जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करणे टाळल्याचे दिसून आले. त्यामुळे अर्ज स्वीकृतीच्या अखेरच्या दिवशी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची रीघ लागण्याची शक्यता आहे.निवडणूक बिनविरोध व्हावी क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यापार्श्वभूमीवर संस्थेच्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील एकत्रित विकासात्मक वाटचालीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन ज्येष्ठ सभासदांनी केले आहे. शिक्षणात आमूलाग्र बदल होत असताना गुणात्मक व सामाजिक उपयुक्ततेसाठी ‘क्रांतिवीर व्हिजन २०५०’पर्यंतचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने एकत्रित प्रयत्नांसाठी समाजधुरिणांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे ज्येष्ठांनी म्हटले आहे.