शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

एकूण १०३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 01:47 IST

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी (दि.२) दाखल झालेल्या २२ उमेदवारी अर्जांसह आतापर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे १०३ अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देनाईक शिक्षणसंस्था निवडणूक : आज गर्दी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी (दि.२) दाखल झालेल्या २२ उमेदवारी अर्जांसह आतापर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे १०३ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र याच पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी मंगळवारी अमावास्या असल्याने अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पुढे ढकला आहे. त्यामुळे बुधवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची रीघ लागण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी मंगळवारी केवळ एकच अर्ज दाखल झाला असून, विश्वस्तांच्या जागेसाठी ९, संचालकसाठी ११ व स्त्री संचालकसाठी एक अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आत्तापर्यंत तब्बल १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात रविवारी २२, सोमवारी ५७, तर मंगळवारी दाखल झालेल्या २२ अर्जांचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्र्रक्रियेत एकूण २२ अर्ज दाखल झाले असले तरी यात पदाधिकाºयांच्या जागांपैकी उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मण जायभावे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. अर्ज स्वीकृतीची मुदत बुधवारी संपणार असून, मुदत संपण्यास केवळ एक दिवस शिल्लक असतानाही मंगळवारी के वळ अमावास्या असल्यामुळे पदाधिकाºयांच्या जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करणे टाळल्याचे दिसून आले. त्यामुळे अर्ज स्वीकृतीच्या अखेरच्या दिवशी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची रीघ लागण्याची शक्यता आहे.निवडणूक बिनविरोध व्हावी क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यापार्श्वभूमीवर संस्थेच्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील एकत्रित विकासात्मक वाटचालीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन ज्येष्ठ सभासदांनी केले आहे. शिक्षणात आमूलाग्र बदल होत असताना गुणात्मक व सामाजिक उपयुक्ततेसाठी ‘क्रांतिवीर व्हिजन २०५०’पर्यंतचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने एकत्रित प्रयत्नांसाठी समाजधुरिणांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे ज्येष्ठांनी म्हटले आहे.