शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

एकूण १०३ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 01:47 IST

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी (दि.२) दाखल झालेल्या २२ उमेदवारी अर्जांसह आतापर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे १०३ अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देनाईक शिक्षणसंस्था निवडणूक : आज गर्दी होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी (दि.२) दाखल झालेल्या २२ उमेदवारी अर्जांसह आतापर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी सुमारे १०३ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र याच पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी मंगळवारी अमावास्या असल्याने अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पुढे ढकला आहे. त्यामुळे बुधवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची रीघ लागण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी मंगळवारी केवळ एकच अर्ज दाखल झाला असून, विश्वस्तांच्या जागेसाठी ९, संचालकसाठी ११ व स्त्री संचालकसाठी एक अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आत्तापर्यंत तब्बल १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात रविवारी २२, सोमवारी ५७, तर मंगळवारी दाखल झालेल्या २२ अर्जांचा समावेश आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्र्रक्रियेत एकूण २२ अर्ज दाखल झाले असले तरी यात पदाधिकाºयांच्या जागांपैकी उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मण जायभावे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. अर्ज स्वीकृतीची मुदत बुधवारी संपणार असून, मुदत संपण्यास केवळ एक दिवस शिल्लक असतानाही मंगळवारी के वळ अमावास्या असल्यामुळे पदाधिकाºयांच्या जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करणे टाळल्याचे दिसून आले. त्यामुळे अर्ज स्वीकृतीच्या अखेरच्या दिवशी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची रीघ लागण्याची शक्यता आहे.निवडणूक बिनविरोध व्हावी क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यापार्श्वभूमीवर संस्थेच्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील एकत्रित विकासात्मक वाटचालीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन ज्येष्ठ सभासदांनी केले आहे. शिक्षणात आमूलाग्र बदल होत असताना गुणात्मक व सामाजिक उपयुक्ततेसाठी ‘क्रांतिवीर व्हिजन २०५०’पर्यंतचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने एकत्रित प्रयत्नांसाठी समाजधुरिणांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे ज्येष्ठांनी म्हटले आहे.