शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

दळवट भूकंप प्रवण क्षेत्र : आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश वीजतारा बदलण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:27 IST

कळवण : वीजपुरवठा व कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी दळवट येथे आदिवासी शेतकºयांनी दिलेला ठिय्या व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणची यंत्रणा खडबडून जागी झाली

ठळक मुद्देअनियमित वीजपुरवठा व जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यागहू जळून खाक झाल्याने ५० हजारांचे नुकसान

कळवण : तालुक्यातील अनियमित वीजपुरवठा व कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी मंगळवारी दळवट येथे वीज उपकेंद्र आवारात आदिवासी शेतकºयांनी दिलेला ठिय्या व गेल्या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसने मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे महावितरणची यंत्रणा खडबडून जागी झाली असून, तब्बल चाळीस वर्षांनंतर दळवट परिसरातील कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यास सुरुवात करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दळवट भूकंप प्रवण क्षेत्रात वीज वितरण कंपनीकडून होणारा अनियमित वीजपुरवठा व जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या यामुळे वीज कंपनीविरोधात आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या आठवड्यात तालुक्यात दोन आंदोलने करण्यात आली. मागील सप्ताहात दळवट येथे वीजवाहिनी तुटून येथील विश्वनाथ भोये यांच्या शेतातील उभा गहू जळून खाक झाल्याने ५० हजारांचे नुकसान झाले. वीज समस्येबाबत महावितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधून कळवण तालुक्यातील वीज समस्येकडे लक्ष वेधले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसने शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी सलग दोन दिवस दळवट वीज उपकेंद्र व कोल्हापूर फाटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील पायरीवर ठिय्या आंदोलन केले होते.महावितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी दळवट परिसरात भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने तत्काळ उपाययोजना करण्याबाबत व महावितरणच्या यंत्रणेला तालुक्यातील जीर्ण वीजवाहिन्या बदलण्यासाठी विशेष सूचना करून वीज समस्यांचा वस्तुस्थितीनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. सोमवारी नाशिक येथे कळवण तालुक्यातील वीज समस्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. कळवण तालुक्यात ग्रामीण व आदिवासी भागात वीज वितरण कंपनीने विजेचे विणलेले जाळे आता जीर्ण झाले आहे. वीजवाहिन्या अनेक वर्षांपासून असल्याने त्या जीर्ण झाल्या आहेत. परिणामी त्या तुटत असून, शेतकºयांचे नुकसान होत आहे. दळवट व परिसरात सन १९७८ मध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. दळवट ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी निवेदन देऊन जीर्ण झाल्याचे निदर्शनास आणून देत वीजवाहिन्या बदलण्याची मागणी केली होती. वीजपुरवठा जोडणी करण्यासाठी शेतातून तारा ओढलेल्या असल्याने त्या वीजतारा कालबाह्य होऊन त्यांची क्षमता संपली आहे. आदिवासी व ग्रामीण भागात वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळेशेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने त्या बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील आदिवासी शेतकºयांनी वेळोवळी केली होती. तारा बदलण्यास सुरुवात झाल्याने आता परिसरातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.