शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

दळवट भूकंप प्रवण क्षेत्र : आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश वीजतारा बदलण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:27 IST

कळवण : वीजपुरवठा व कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी दळवट येथे आदिवासी शेतकºयांनी दिलेला ठिय्या व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे महावितरणची यंत्रणा खडबडून जागी झाली

ठळक मुद्देअनियमित वीजपुरवठा व जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यागहू जळून खाक झाल्याने ५० हजारांचे नुकसान

कळवण : तालुक्यातील अनियमित वीजपुरवठा व कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यासाठी मंगळवारी दळवट येथे वीज उपकेंद्र आवारात आदिवासी शेतकºयांनी दिलेला ठिय्या व गेल्या बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसने मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे महावितरणची यंत्रणा खडबडून जागी झाली असून, तब्बल चाळीस वर्षांनंतर दळवट परिसरातील कालबाह्य झालेल्या वीजवाहिन्या बदलण्यास सुरुवात करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दळवट भूकंप प्रवण क्षेत्रात वीज वितरण कंपनीकडून होणारा अनियमित वीजपुरवठा व जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या यामुळे वीज कंपनीविरोधात आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या आठवड्यात तालुक्यात दोन आंदोलने करण्यात आली. मागील सप्ताहात दळवट येथे वीजवाहिनी तुटून येथील विश्वनाथ भोये यांच्या शेतातील उभा गहू जळून खाक झाल्याने ५० हजारांचे नुकसान झाले. वीज समस्येबाबत महावितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांच्याशी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधून कळवण तालुक्यातील वीज समस्येकडे लक्ष वेधले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसने शासन व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी सलग दोन दिवस दळवट वीज उपकेंद्र व कोल्हापूर फाटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील पायरीवर ठिय्या आंदोलन केले होते.महावितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी दळवट परिसरात भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने तत्काळ उपाययोजना करण्याबाबत व महावितरणच्या यंत्रणेला तालुक्यातील जीर्ण वीजवाहिन्या बदलण्यासाठी विशेष सूचना करून वीज समस्यांचा वस्तुस्थितीनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. सोमवारी नाशिक येथे कळवण तालुक्यातील वीज समस्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. कळवण तालुक्यात ग्रामीण व आदिवासी भागात वीज वितरण कंपनीने विजेचे विणलेले जाळे आता जीर्ण झाले आहे. वीजवाहिन्या अनेक वर्षांपासून असल्याने त्या जीर्ण झाल्या आहेत. परिणामी त्या तुटत असून, शेतकºयांचे नुकसान होत आहे. दळवट व परिसरात सन १९७८ मध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. दळवट ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी निवेदन देऊन जीर्ण झाल्याचे निदर्शनास आणून देत वीजवाहिन्या बदलण्याची मागणी केली होती. वीजपुरवठा जोडणी करण्यासाठी शेतातून तारा ओढलेल्या असल्याने त्या वीजतारा कालबाह्य होऊन त्यांची क्षमता संपली आहे. आदिवासी व ग्रामीण भागात वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळेशेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने त्या बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातील आदिवासी शेतकºयांनी वेळोवळी केली होती. तारा बदलण्यास सुरुवात झाल्याने आता परिसरातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.