शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

हिंदू समाज बाबासाहेबांच्या चिंतेचा विषय : रमेश पांडव

By admin | Updated: January 29, 2017 00:24 IST

‘राष्ट्रभक्त बाबासाहेब आंबेडकर’ विशेषांकाचे प्रकाशन

नाशिक : सर्वत्र परमात्मा पाहण्याची शिकवण देणाऱ्या हिंदू समाजात माणसालाच कनिष्ठ वागणूक दिली जात असल्याने या समाजाचे प्रबोधन होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वाधिक चिंतित होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र सामाजिक समरसता मंचचे सहनिमंत्रक प्रा. रमेश पांडव यांनी केले. भारतातील बहुसंख्य हिंदू समाजाने ‘सामाजिक एकात्मता’ समजून घेतली तरच येथे धर्मनिपेक्ष घटनेची दीर्घकाळ अंमलबजावणी शक्य असल्याचे बाबासाहेबांनी ओळखले होते. त्यामुळेच हिंदू समाज आणि हिंदूचे शिक्षण हा त्यांच्या चिंतेचा विषय बनला होता, असे मत पांडव यांनी व्यक्त केले.  संस्कृती जागरण मंडळ पुणे व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य संकूल येथील डॉ. कुर्तकोटी सभागृहात शनिवारी (दि.२८) सांस्कृतिक वार्तापत्र, पुणे यांच्यातर्फे ‘राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष आनंद जोशी, भदन्त ग्यानजगत महास्यवी, मानवधन संस्थेचे प्रकाश कोल्हे उपस्थित होते. याप्रसंगी पांडव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करताना ‘लष्कराच्या छावणीत जन्मलेल्या या योद्धाने जीवनभर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला’ असे गौरवोद्गार काढले. ज्या महापुरुषाचे काळाराम मंदिरात स्वागत करायला हवे होते, आमंत्रित करून गोड तळ्याचे पाणी द्यायला हवे होते. त्यांना सामाजिक शिक्षणाच्या अभावामुळे या गोष्टी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. परंतु,याठिकाणी विरोध करणाऱ्या सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांना मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. पांडव यांनी हिंदू समाजाच्या परंपरांविषयी बोलताना विविध ऋषींच्या कुळांचा उल्लेख करताना त्यांनी ज्याप्रमाणे ज्ञानाच्या जोरावर वंश परंपरेवर मात केली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरांच्या विरोधात ज्ञानाचा संघर्ष करीत समाजाला न्याय मिळविण्यासाठी लढा उभाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक दिलीप शेटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नागमोती यांनी केले. (प्रतिनिधी)