शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

हिंदू समाज बाबासाहेबांच्या चिंतेचा विषय : रमेश पांडव

By admin | Updated: January 29, 2017 00:24 IST

‘राष्ट्रभक्त बाबासाहेब आंबेडकर’ विशेषांकाचे प्रकाशन

नाशिक : सर्वत्र परमात्मा पाहण्याची शिकवण देणाऱ्या हिंदू समाजात माणसालाच कनिष्ठ वागणूक दिली जात असल्याने या समाजाचे प्रबोधन होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वाधिक चिंतित होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र सामाजिक समरसता मंचचे सहनिमंत्रक प्रा. रमेश पांडव यांनी केले. भारतातील बहुसंख्य हिंदू समाजाने ‘सामाजिक एकात्मता’ समजून घेतली तरच येथे धर्मनिपेक्ष घटनेची दीर्घकाळ अंमलबजावणी शक्य असल्याचे बाबासाहेबांनी ओळखले होते. त्यामुळेच हिंदू समाज आणि हिंदूचे शिक्षण हा त्यांच्या चिंतेचा विषय बनला होता, असे मत पांडव यांनी व्यक्त केले.  संस्कृती जागरण मंडळ पुणे व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य संकूल येथील डॉ. कुर्तकोटी सभागृहात शनिवारी (दि.२८) सांस्कृतिक वार्तापत्र, पुणे यांच्यातर्फे ‘राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष आनंद जोशी, भदन्त ग्यानजगत महास्यवी, मानवधन संस्थेचे प्रकाश कोल्हे उपस्थित होते. याप्रसंगी पांडव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करताना ‘लष्कराच्या छावणीत जन्मलेल्या या योद्धाने जीवनभर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला’ असे गौरवोद्गार काढले. ज्या महापुरुषाचे काळाराम मंदिरात स्वागत करायला हवे होते, आमंत्रित करून गोड तळ्याचे पाणी द्यायला हवे होते. त्यांना सामाजिक शिक्षणाच्या अभावामुळे या गोष्टी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. परंतु,याठिकाणी विरोध करणाऱ्या सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांना मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. पांडव यांनी हिंदू समाजाच्या परंपरांविषयी बोलताना विविध ऋषींच्या कुळांचा उल्लेख करताना त्यांनी ज्याप्रमाणे ज्ञानाच्या जोरावर वंश परंपरेवर मात केली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरांच्या विरोधात ज्ञानाचा संघर्ष करीत समाजाला न्याय मिळविण्यासाठी लढा उभाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक दिलीप शेटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नागमोती यांनी केले. (प्रतिनिधी)