शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:41 IST

सटाणा : कमी पावसामुळे परिस्थिती गंभीर बनल्याने देवळा आणि बागलाण तालुक्यातील बऱ्याच भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच दुष्काळ निवारणासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या तालुक्यांतील दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत बोलताना दिली. दरम्यान, गिरीश महाजन यांचा ताफा सटाणा शहरात येताच युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देगिरीश महाजन : कॉँग्रेस-राष्टÑवादीने दाखविले काळे झेंडे

सटाणा येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांना काळे झेंडे दाखविणारे कॉँग्रेस, राष्टÑवादीचे कार्यकर्ते.

 

सटाणा : कमी पावसामुळे परिस्थिती गंभीर बनल्याने देवळा आणि बागलाण तालुक्यातील बऱ्याच भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच दुष्काळ निवारणासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या तालुक्यांतील दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत बोलताना दिली. दरम्यान, गिरीश महाजन यांचा ताफा सटाणा शहरात येताच युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि.१५) बागलाण, देवळा तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली. त्यानंतर बागलाण व देवळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील पंचायत समितीत सर्व खातेप्रमुख, अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी महाजन बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची पाहणी करून आगामी आठ दिवसांत माहिती सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पिकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. पेरणीपुरता पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजावर मोठे संकट आले आहे. रोज पाण्याच्या टॅँकरची मागणी वाढत असल्याचे धक्कादायक चित्र असले तरीही दुष्काळावर मात करण्यासाठी आणि शेतकºयांना शक्य तेवढी मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही महाजन यांनी सांगितले. दरम्यान, हरणबारी डाव्या कालव्याचे काम आठवडाभरात सुरू होणार असून तळवाडे-भामेर एक्स्प्रेस कालवा पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी देवळा-चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, डॉ. विलास बच्छाव, मनोहर देवरे, दिलीप अहिरे यांनी दुष्काळाची दाहकता लक्षात आणून देत शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी केली.नदीजोड प्रकल्प प्रमुख ध्येयराज्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असून, या महत्त्वपूर्ण कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच ३० हजार कोटी रु पयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. लवकरच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. आगामी सहा महिन्यांच्या आत या कामाला सुरु वात करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ताफा सटाणा शहरात येताच युवक कॉँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. बीजेपी सरकार हाय हाय, महाराष्ट्र दुष्काळी जाहीर झालाच पाहिजे, पेट्रोल, डिझेल जीएसटी कक्षेत आला पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षे झाले तरी प्रथमच बागलाण तालुका दौºयावर पालकमंत्री आले म्हणून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक काकाजी सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, सटाणा पोलिसांनी नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक काका सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन सोनवणे, काँग्रेस शहराध्यक्ष किशोर कदम, प्रसाद ऊर्फ चिक्या छाजेड यांना अटक केली. काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.