शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टमाट्याचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 1:16 PM

वणी : अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांना आता टमाट्याचा आधार आहे.

वणी : अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांना आता टमाट्याचा आधार आहे. वणी सापुतारा रस्त्यावरील बाजारसमीतीच्या उपबाजारात व खोरीफाटा भागात टमाटा खरेदी विक्र ी केन्द्र सुरु झाले आहे. सद्यस्थितीत सुमारे ५० हजार क्विंटल आवक टमाट्याची होत आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील व्यापारी टमाटा खरेदीचे व्यवहार करत आहेत. प्रतिदिवशी सुमारे २५ ट्रक टमाटा परराज्यात विक्र ीसाठी जात आहे, अशी माहिती टमाटा व्यापारी संजय उंबरे यांनी दिली. यानिमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होते आहे. टमाटा खरेदी विक्री व्यवहार प्रणालीमुळे वणी सापुतारा रस्त्याला यात्रेचे स्वरु प आले आहे. ट्रॅक्टर, पिकअप जीप, छोटा हत्ती अशा विविध वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान सद्यस्थितीत टमाट्याला मिळणाºया भावामुळे उत्पादकांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळाला आहे.दिंडोरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध पिकांची वाताहात झाली आहे. नुकसानीचे पंचनामे भरपाईची मागणी याबाबतीत सर्वच स्तरावरु न पाठपुरावा सुरु आहे. तालुक्यातील द्राक्षबागाचे सुमारे पन्नास टक्के नुकसान झाले आहे. भात, नागली वरई ही पिकेही धोक्यात आली आहेत. टमाटा पिकाचेही नुकसान झाले आहे. मात्र तुलनात्मक कमी असले तरी सध्या टमाट्याला बºयापैकी भाव असल्याने टमाटा उत्पादकांना तेवढाच आधार आता उरला आहे. सुमारे दोनशे ते चारशे पन्नास असा दर प्रतवारी व दर्जानुसार उत्पादकांना मिळतो आहे. दिंडोरीतालुक्यात टमाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे नुकसान झाल्यानंतर दुबार लागवड करण्यात आली होती. पावसाच्या तडाख्यात काही उत्पादकांचे नुकसान झाले मात्र तरीही अशा प्रसंगाला सामोरे जाऊन बहुतांशी उत्पादकांनी हे पिक जगविण्यासाठी आर्थिक अतिरिक्त भार सोसला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक