शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

टमाटा, कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:31 IST

सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादनात सर्वत्र परिचित असणा-या ठाणगाव परिसरातील साठवलेला उन्हाळ कांदा सडला आहे. टमाट्यालाही समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

गेल्या वर्षी लाल कांदाला समाधानकारक भाव मिळाल्याने यावर्षी सर्वच शेतकºयांनी आपला उन्हाळ कांदा चाळीमध्ये साठवणूक करुन ठेवला होता. कांद्याचे दर आहे तेवढेच राहील्याने शेतक-यांनी आपला कांदा चाळीतच तसाच ठेवल्याने आता चाळीतील कांदा पूर्णपणे सडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाने यावर्षी सुरु वातीपासूनच दांडी मारली पण म्हाळुंगी नदीच्या उगम स्थानी समाधानकारक पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदी प्रवाहीत झाली. त्या पाण्यावर शेतक-यांनी नर्सरी मधून जादा भावाने टोमॅटोचे रोपे आणून लागवड केली. परिसरातील टमाटे मुंबई येथील वाशी मार्केटला पाठविण्यात येतो, तेथेही दहा किलोस ६० ते ७० रुपये भाव मिळत असल्याने शेतक-यांच्या नावाने बाकी शून्य येत आहे. टमाटा लागवडीस सुरुवातीपासून हवामानातील बदलामुळे खूप महागडी औषधाची फवारणी करु न टमाटे पिके वाचवली होती. आज तोडण्यासाठी आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अगोदरच आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. उन्हाळ कांदा साठवून ठेवल्याने पावसाळ्यात कांद्याला समाधानकारक भाव मिळेल या आशेवर असणारा शेतकरी मात्र कांद्याच्या दरात घसरण झाल्याने हाताश झाला आहे. आपल्या खिशातील पैशाची शेतात गुंतवणूक केल्याने शेतकरी आणखीणच अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा