शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

नाशिक जिल्ह्यात टमाट्याचा हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:00 IST

भावात घसरण : ओझर-सुकेणे पट्टयाला मोठा फटका

ठळक मुद्देखर्च निघत नसल्याने शेतक-यांनी टमाट्याची तोडणीच बंद केली आहे

ओझर : नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून नावारूपाला आलेल्या टमाट्याचा हंगाम संकटात सापडला असून ओझर ते सुकेणे पट्टयातील जवळपास संपूर्ण पीक वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. टमाट्याच्या भावात सातत्याने होणारी घसरण यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांवर टमाटा अक्षरश: रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली आहे.नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जून ते आॅक्टोबर महिन्यात टमाट्याचे पीक घेतले जाते. मागील वर्षी याच हंगामात टमाट्याला ३०० ते ४०० रूपये प्रति २० किलो क्रटला भाव मिळाला होता. शेतक-यांना त्यातून चांगली कमाईही झाली होती. मात्र, यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच प्रति क्रट ३० ते ४० रूपये असल्याने खर्च निघत नसल्याने शेतक-यांनी टमाट्याची तोडणीच बंद केली आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज दीड ते दोन लाख क्रट टमाटे विक्रसाठी येतात. थोडया दिवसात हि संख्या तीन लाखावर जाण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी आवक यामुळे बाजार भावावर त्याचा परिणाम होत असल्याने भाव सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात वाढणार नाही, असे व्यापारी सांगत आहेत. तर जून-जुलै महिन्यात लागवड केलेले टमाटे कवडीमोल भावात विक्री करावी लागणार असल्याची भीती शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहेआवक वाढल्याने परिणामयंदा राज्यात बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस पडल्याने आणि वातावरण पोषक असल्याने टमाट्याचे पीक भरघोस आले आहे. त्यामुळे आवक मोठया प्रमाणात आहे. नाशिक जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील माल विक्रसाठी उपलब्ध होत आहे. इतर राज्यात चांगला पाऊस पडल्याने टमट्याचे भरघोस पीक आल्याने प्रचंड आवक आहे मात्र त्या तुलनेत खरेदी करणा-या व्यापा-यांची संख्या कमी आहे. खरेदी होत नसल्याने शेतक-यांचा माल बाजार समितीच्या आवारात पडून रहात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक