शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात टमाट्याचा हंगाम संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:00 IST

भावात घसरण : ओझर-सुकेणे पट्टयाला मोठा फटका

ठळक मुद्देखर्च निघत नसल्याने शेतक-यांनी टमाट्याची तोडणीच बंद केली आहे

ओझर : नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून नावारूपाला आलेल्या टमाट्याचा हंगाम संकटात सापडला असून ओझर ते सुकेणे पट्टयातील जवळपास संपूर्ण पीक वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. टमाट्याच्या भावात सातत्याने होणारी घसरण यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांवर टमाटा अक्षरश: रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली आहे.नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जून ते आॅक्टोबर महिन्यात टमाट्याचे पीक घेतले जाते. मागील वर्षी याच हंगामात टमाट्याला ३०० ते ४०० रूपये प्रति २० किलो क्रटला भाव मिळाला होता. शेतक-यांना त्यातून चांगली कमाईही झाली होती. मात्र, यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच प्रति क्रट ३० ते ४० रूपये असल्याने खर्च निघत नसल्याने शेतक-यांनी टमाट्याची तोडणीच बंद केली आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज दीड ते दोन लाख क्रट टमाटे विक्रसाठी येतात. थोडया दिवसात हि संख्या तीन लाखावर जाण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी आवक यामुळे बाजार भावावर त्याचा परिणाम होत असल्याने भाव सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात वाढणार नाही, असे व्यापारी सांगत आहेत. तर जून-जुलै महिन्यात लागवड केलेले टमाटे कवडीमोल भावात विक्री करावी लागणार असल्याची भीती शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहेआवक वाढल्याने परिणामयंदा राज्यात बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस पडल्याने आणि वातावरण पोषक असल्याने टमाट्याचे पीक भरघोस आले आहे. त्यामुळे आवक मोठया प्रमाणात आहे. नाशिक जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील माल विक्रसाठी उपलब्ध होत आहे. इतर राज्यात चांगला पाऊस पडल्याने टमट्याचे भरघोस पीक आल्याने प्रचंड आवक आहे मात्र त्या तुलनेत खरेदी करणा-या व्यापा-यांची संख्या कमी आहे. खरेदी होत नसल्याने शेतक-यांचा माल बाजार समितीच्या आवारात पडून रहात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक