शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांसाठी ‘टोल-फ्री’ क्रमांक जिल्हाधिकारी : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:49 IST

नांदगाव : शेतकºयांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनातर्फे शेतकºयांसाठी लवकरच ‘टोल-फ्री’ क्रमांक योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

ठळक मुद्देमहाराजस्व अभियानशेतीपूरक जोडउद्योग सुरू करावे

नांदगाव : शेतकºयांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी या संकटाचा सामुदायिकपणे सामना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शेतकºयांसाठी लवकरच ‘टोल-फ्री’ क्रमांक योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे शनी महाराज देवस्थान व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराजस्व अभियान व कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार संजय पवार, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, जेष्ठ नेत्या जयश्रीताई दोंड, सभापती सुमनताई निकम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. शनेश्वर देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ व माजी आमदार अनिल अहेर यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील पाणीप्रश्न व जिल्ह्यात सर्वाधिक शेतकºयांच्या झालेल्या आत्महत्या या नांदगाव तालुक्यातील असल्याबद्दलची खंत व्यक्त केली. हाच धागा पकडीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नांदगाव तालुक्यातील शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता शेतकºयांनी संघटित होऊन सामुदायिकपणे शेतीपूरक जोडउद्योग सुरू करावे, असे आवाहन केले. तसेच शेतकºयांनी दुग्ध, पोल्ट्री यासारखे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन उभे करावे. कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न कसे मिळेल यावर शेतकºयांनी भर द्यावा, असेही ते म्हणाले. कृषी विभागाच्या योजनांचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, आत्महत्या करणे हा कर्जाला पर्याय नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या हस्ते जातीचे दाखले व शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. येवल्याचे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, आत्माचे संचालक अशोक कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.८० हून अधिक माहितीपर दालनेमहसूल विभागाच्या वतीने विविध शासकीय दाखल्यांसाठी या प्रदर्शनात स्टॉल मांडण्यात आले होते. त्याला जोडून शेतकºयांच्या प्रबोधनासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे ८० हून अधिक माहितीपर दालने लावण्यात आली होती. त्यात कांदा, द्राक्षे, गहू, मका, बाजरी, तांदूळ, हरभरा, कपाशी व कांदा पिकावरील स्टॉलवर जाऊन शेतकरी माहिती घेत होते. शेकडो नागरिकांनीदेखील विविध दाखल्यांसाठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.