शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शेतकºयांसाठी ‘टोल-फ्री’ क्रमांक जिल्हाधिकारी : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:49 IST

नांदगाव : शेतकºयांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनातर्फे शेतकºयांसाठी लवकरच ‘टोल-फ्री’ क्रमांक योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

ठळक मुद्देमहाराजस्व अभियानशेतीपूरक जोडउद्योग सुरू करावे

नांदगाव : शेतकºयांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी या संकटाचा सामुदायिकपणे सामना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शेतकºयांसाठी लवकरच ‘टोल-फ्री’ क्रमांक योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे शनी महाराज देवस्थान व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराजस्व अभियान व कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार संजय पवार, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, जेष्ठ नेत्या जयश्रीताई दोंड, सभापती सुमनताई निकम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. शनेश्वर देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ व माजी आमदार अनिल अहेर यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील पाणीप्रश्न व जिल्ह्यात सर्वाधिक शेतकºयांच्या झालेल्या आत्महत्या या नांदगाव तालुक्यातील असल्याबद्दलची खंत व्यक्त केली. हाच धागा पकडीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नांदगाव तालुक्यातील शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता शेतकºयांनी संघटित होऊन सामुदायिकपणे शेतीपूरक जोडउद्योग सुरू करावे, असे आवाहन केले. तसेच शेतकºयांनी दुग्ध, पोल्ट्री यासारखे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन उभे करावे. कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न कसे मिळेल यावर शेतकºयांनी भर द्यावा, असेही ते म्हणाले. कृषी विभागाच्या योजनांचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, आत्महत्या करणे हा कर्जाला पर्याय नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या हस्ते जातीचे दाखले व शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. येवल्याचे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, आत्माचे संचालक अशोक कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.८० हून अधिक माहितीपर दालनेमहसूल विभागाच्या वतीने विविध शासकीय दाखल्यांसाठी या प्रदर्शनात स्टॉल मांडण्यात आले होते. त्याला जोडून शेतकºयांच्या प्रबोधनासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे ८० हून अधिक माहितीपर दालने लावण्यात आली होती. त्यात कांदा, द्राक्षे, गहू, मका, बाजरी, तांदूळ, हरभरा, कपाशी व कांदा पिकावरील स्टॉलवर जाऊन शेतकरी माहिती घेत होते. शेकडो नागरिकांनीदेखील विविध दाखल्यांसाठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.