शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतकºयांसाठी ‘टोल-फ्री’ क्रमांक जिल्हाधिकारी : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:49 IST

नांदगाव : शेतकºयांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनातर्फे शेतकºयांसाठी लवकरच ‘टोल-फ्री’ क्रमांक योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

ठळक मुद्देमहाराजस्व अभियानशेतीपूरक जोडउद्योग सुरू करावे

नांदगाव : शेतकºयांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी या संकटाचा सामुदायिकपणे सामना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शेतकºयांसाठी लवकरच ‘टोल-फ्री’ क्रमांक योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे शनी महाराज देवस्थान व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराजस्व अभियान व कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार संजय पवार, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, जेष्ठ नेत्या जयश्रीताई दोंड, सभापती सुमनताई निकम यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. शनेश्वर देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ व माजी आमदार अनिल अहेर यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील पाणीप्रश्न व जिल्ह्यात सर्वाधिक शेतकºयांच्या झालेल्या आत्महत्या या नांदगाव तालुक्यातील असल्याबद्दलची खंत व्यक्त केली. हाच धागा पकडीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नांदगाव तालुक्यातील शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता शेतकºयांनी संघटित होऊन सामुदायिकपणे शेतीपूरक जोडउद्योग सुरू करावे, असे आवाहन केले. तसेच शेतकºयांनी दुग्ध, पोल्ट्री यासारखे व्यवसाय प्रशिक्षण घेऊन उभे करावे. कमी गुंतवणुकीत अधिक उत्पन्न कसे मिळेल यावर शेतकºयांनी भर द्यावा, असेही ते म्हणाले. कृषी विभागाच्या योजनांचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, आत्महत्या करणे हा कर्जाला पर्याय नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या हस्ते जातीचे दाखले व शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. येवल्याचे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, आत्माचे संचालक अशोक कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.८० हून अधिक माहितीपर दालनेमहसूल विभागाच्या वतीने विविध शासकीय दाखल्यांसाठी या प्रदर्शनात स्टॉल मांडण्यात आले होते. त्याला जोडून शेतकºयांच्या प्रबोधनासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे ८० हून अधिक माहितीपर दालने लावण्यात आली होती. त्यात कांदा, द्राक्षे, गहू, मका, बाजरी, तांदूळ, हरभरा, कपाशी व कांदा पिकावरील स्टॉलवर जाऊन शेतकरी माहिती घेत होते. शेकडो नागरिकांनीदेखील विविध दाखल्यांसाठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.