शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

महंतांच्या कोपशांतीसाठी आज बैठक ‘विधी’ नाराजी दूर करणार : नव्या जिल्हाधिकाऱ्यांची सत्वपरीक्षा

By admin | Updated: February 10, 2015 01:43 IST

महंतांच्या कोपशांतीसाठी आज बैठक ‘विधी’ नाराजी दूर करणार : नव्या जिल्हाधिकाऱ्यांची सत्वपरीक्षा

  नाशिक : कुंभमेळ्यात शैव पंथीयांच्या शाहीस्नानाच्या जागेवर म्हणजेच त्र्यंबकक्षेत्रास दुय्यम वागणूक मिळत असल्याने साधू-महंत कोपले आणि फडणवीस सरकारला दुषणे दिली. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून, महंतांचा कोप कमी करण्यासाठी मंगळवारी त्र्यंबकेश्वरला बैठक विधी होणार आहे. विविध आखाड्यांच्या महंतांना निमंत्रित करून विश्वासात घेतले जाणार असल्याचे वृत्त आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, परंतु अवघ्या दहा कोटी रुपयांची कामेही त्र्यंबकेश्वरी सुरू नाही. त्यामुळे येथील आखाड्यांच्या महंतांनी संताप व्यक्त केला आहे. रविवारी अखिल भारतीर दर्शन आखाडा परीषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद आणि श्री निरंजनी आखाड्याचे सचिव नरेंद्रगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि सारा रोष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्त केला. गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आणि अशा प्रदूषित नदीत कुंभमेळा कसा पार पडणार असा प्रश्न केला. शैव महंतांच्या या कोपवाणीने प्रशासन भयभीत झाले असावे त्यांनी तातडीने मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्र्यंबकेश्वर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व आखाड्यांच्या महंतांना बोलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त एकनाथ डवले आणि नवे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह हे उपस्थित राहणार आहे. नाशिकमध्ये बदलून आल्यानंतर कुशवाह यांची ही पहिलीच बैठक असून, त्यामुळेच त्यांची सत्वपरीक्षाच ठरणार आहे. दुपारी तीन वाजताही जिल्हाधिकारी कुशवाह हे कुंभमेळ्याची साप्ताहिक बैठक घेणार आहेत. (प्रतिनिधी)