शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

आजपासून साहित्यिक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:12 IST

१७७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे शनिवार (दि. २३)पासून आयोजन करण्यात आले असून, ग्रंथदिंडीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

नाशिक : १७७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे शनिवार (दि. २३)पासून आयोजन करण्यात आले असून, ग्रंथदिंडीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. सकाळी ९ वाजता टिळकवाडी येथील कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या सोहळ्यास सुरुवात होणार असून, या ग्रंथदिंडीत शहरातील १३ शाळेतील हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसह चित्ररथ, ढोलपथक, लेजीम पथक, ध्वज पथक आदींचा समावेश असणार आहे. परशुराम साईखेडकर येथे ग्रंथदिंडीचा समारोप झाल्यानंतर सकाळी ११ वाजता साहित्यिक मेळाव्याचे सिनेअभिनेते तथा नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाप्रसंगी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या माजी अध्यक्षांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात २ वाजता ‘नाटक : काल आज आणि उद्या’, तर तीन वाजता ‘कवितेचे अंतरंग’ या विषयावरील परिसंवाद रंगणार आहे. साहित्य मेळाव्याचे अध्यक्ष नाट्य लेखक दत्ता पाटील यांचा आतापर्यंतचा जीवनपट उलगडून सांगणाºया ध्वनी चित्रफितीचे संध्याकाळी साडेचार वाजता सादरीकरण करण्यात येणार असून, खुल्या साहित्य संमेलनाने साहित्य मेळाव्याच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांचा समारोप होणार आहे. रविवारी (दि. २४) साहित्यिक मेळाव्याच्या दुसºया दिवशी सकाळी १० वाजता मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील यांचे बीजभाषण होणार असून, सकाळी ११ वाजता ‘समाज माध्यमांचे साहित्यावर होणारे परिणाम’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे.मेळाव्याच्या दुसºया दिवशी सावानातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच रविवारी संध्याकाळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांना ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते सन्मानित करून सुवर्ण महोत्सवी साहित्यिक मेळाव्याचा समारोप होणार आहे. सावानाच्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यास उपस्थित राहणाºया श्रोत्यांना सावानातर्फे विशेष सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी दिली. दोन दिवस चालणाºया या साहित्यिक मेळाव्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.