शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून पाणीकपात पूर्णत: रद्द

By admin | Updated: August 9, 2016 01:05 IST

महापौरांची घोषणा : १५ आॅगस्टपासून दोनवेळ पाणीपुरवठा; नागरिकांना मिळणार दिलासा

नाशिक : गेल्या पाच-सहा दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग होऊनही गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० टक्के असल्याने दहा महिन्यांपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठ्यामुळे सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात मंगळवार, दि. ९ आॅगस्टपासून पूर्णत: रद्द करण्याची घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी केली आहे. दरम्यान, ज्या भागात यापूर्वी दोनवेळ पाणीपुरवठा केला जात होता तो येत्या १५ आॅगस्टपासून पूर्ववत सुरू केला जाणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. महापौरांच्या या घोषणेमुळे नाशिककरांना आता पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.गेल्या मंगळवारी (दि.२) झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीसह सर्व नद्यांना महापूर आले. त्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून गोदावरीला पूरस्थिती कायम होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तरीही गंगापूर धरणात आजमितीला ८० टक्के पाणीसाठा आहे. मागील महिन्यात १० जुलैला झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती. त्याचवेळी पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर महापौरांनी ११ जुलैपासून दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, एकवेळ पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात कायम होती. गेल्या काही दिवसांपासून धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने महापालिकेने संपूर्ण पाणीकपात रद्द करून दोनवेळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी होऊ लागली होती. गेल्यावर्षी गंगापूर धरणातील पाणीसाठा ७०.७१ टक्के असताना जायकवाडीसाठी १.३६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासून एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला होता. त्यानंतर महापौरांनी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी विशेष महासभा बोलवत एकवेळ पाणीपुरवठ्याबरोबरच आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचे आदेश दिले. मध्यंतरी डिसेंबरमध्ये प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून पाणीकपात वाढविण्याचा प्रयोगही करून पाहिला, परंतु तो लोकप्रतिनिधींनी हाणून पाडला. पुढे २२ फेब्रुवारी २०१६ पासून विभागवार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले, मात्र त्यातही अडचणी उद्भवल्याने महापालिकेने १० मार्च २०१६ पासून आठवड्यातून दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची अंमलबजावणी सुरू केली. त्यानंतर मागील महिन्यात १० जुलैला जोरदार वृष्टी होऊन धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने आशा पल्लवित झालेल्या महापौरांनी ११ जुलैपासून दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केली.