शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

आजपासून पाणीकपात पूर्णत: रद्द

By admin | Updated: August 9, 2016 01:05 IST

महापौरांची घोषणा : १५ आॅगस्टपासून दोनवेळ पाणीपुरवठा; नागरिकांना मिळणार दिलासा

नाशिक : गेल्या पाच-सहा दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग होऊनही गंगापूर धरणातील पाणीसाठा ८० टक्के असल्याने दहा महिन्यांपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठ्यामुळे सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात मंगळवार, दि. ९ आॅगस्टपासून पूर्णत: रद्द करण्याची घोषणा महापौर अशोक मुर्तडक यांनी केली आहे. दरम्यान, ज्या भागात यापूर्वी दोनवेळ पाणीपुरवठा केला जात होता तो येत्या १५ आॅगस्टपासून पूर्ववत सुरू केला जाणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. महापौरांच्या या घोषणेमुळे नाशिककरांना आता पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.गेल्या मंगळवारी (दि.२) झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीसह सर्व नद्यांना महापूर आले. त्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून गोदावरीला पूरस्थिती कायम होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तरीही गंगापूर धरणात आजमितीला ८० टक्के पाणीसाठा आहे. मागील महिन्यात १० जुलैला झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती. त्याचवेळी पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर महापौरांनी ११ जुलैपासून दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, एकवेळ पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून सुरू असलेली १५ टक्के पाणीकपात कायम होती. गेल्या काही दिवसांपासून धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने महापालिकेने संपूर्ण पाणीकपात रद्द करून दोनवेळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी होऊ लागली होती. गेल्यावर्षी गंगापूर धरणातील पाणीसाठा ७०.७१ टक्के असताना जायकवाडीसाठी १.३६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासून एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला होता. त्यानंतर महापौरांनी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी विशेष महासभा बोलवत एकवेळ पाणीपुरवठ्याबरोबरच आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचे आदेश दिले. मध्यंतरी डिसेंबरमध्ये प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून पाणीकपात वाढविण्याचा प्रयोगही करून पाहिला, परंतु तो लोकप्रतिनिधींनी हाणून पाडला. पुढे २२ फेब्रुवारी २०१६ पासून विभागवार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले, मात्र त्यातही अडचणी उद्भवल्याने महापालिकेने १० मार्च २०१६ पासून आठवड्यातून दर गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची अंमलबजावणी सुरू केली. त्यानंतर मागील महिन्यात १० जुलैला जोरदार वृष्टी होऊन धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने आशा पल्लवित झालेल्या महापौरांनी ११ जुलैपासून दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केली.