शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्जाची आज शेवटची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा दरवर्षी जुलै व ...

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा दरवर्षी जुलै व ऑगस्टमध्ये घेतली जाते. कोरोनामुळे यंदा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अद्याप परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले असून, बुधवारी (दि.१८) अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान अर्ज करावे लागणार आहेत.

दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व निवडक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने आवेदपत्रे भरावे लागेल. तर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे २३ व २४ ऑगस्टदरम्यान शुल्क भरावे लागेल. श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २८ मे व २ जुलैच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार परीक्षेची एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी परीक्षा शुल्क भरलेले असेल तर त्यांनी यावेळी शुल्क भरण्याची गरज नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे; मात्र सर्व विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.