शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्जाची आज शेवटची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा दरवर्षी जुलै व ...

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीची पुरवणी परीक्षा दरवर्षी जुलै व ऑगस्टमध्ये घेतली जाते. कोरोनामुळे यंदा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अद्याप परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले असून, बुधवारी (दि.१८) अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान अर्ज करावे लागणार आहेत.

दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व निवडक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने आवेदपत्रे भरावे लागेल. तर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे २३ व २४ ऑगस्टदरम्यान शुल्क भरावे लागेल. श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २८ मे व २ जुलैच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार परीक्षेची एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी परीक्षा शुल्क भरलेले असेल तर त्यांनी यावेळी शुल्क भरण्याची गरज नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे; मात्र सर्व विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.