शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आरटीई प्रवेशाची आज पहिली सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:11 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, मंगळवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता पहिली सोडत काढण्यात येणार आहे.

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, मंगळवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता पहिली सोडत काढण्यात येणार आहे.  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील ४६६ शाळांमधील ६,५८९ जागांसाठी सुमारे दहा हजार ४१६ प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्याल-यासमोरील शासकीय कन्या शाळेत मंगळवारी पहिली सोडत काढण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल घटाकांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक पूर्व व पहिलीसाठी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी आरटीई कायद्यामुळे संधी मिळते. त्यामुळे जिल्हाभरातून सुमारे दहा हजार ४१६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रक्रियेअंतर्गत अर्ज केले आहेत. यापैकी सोडत पद्धतीने प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यासंबंधीची माहितीही मोबाइल संदेशाद्वारे दिली जाणार आहे. प्रवेशाची संधी मिळ-णाºया विद्यार्थ्यांचे पालक १४ ते २४ मार्च या कालावधीत प्रवेश घेऊ शकतील. यानंतर रिक्त असणाºया जागांसाठी दि. २८ ते ३१ मार्च या कालावधीत दुसरी सोडत निघणार असून, दि.२ ते १२ एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे. पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात सोडत पद्धत राबविण्यात येणार असून, या प्रक्रियेचे थेट प्रेक्षपण नाशिकमध्येही पहायला मिळणार असल्याने या प्रक्रियेची पारदर्शकता राखली जाणार आहे. त्यासाठी शासकीय कन्या शाळेत प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Schoolशाळा