शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
5
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
6
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
7
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
8
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
9
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
10
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
11
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
12
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
13
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
14
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
15
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
16
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
17
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
18
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
19
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
20
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

स्व-प्रमाणपत्र नोंदीसाठी टीईटीधारक रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:25 AM

राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत असल्याने टीईटीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नाशिक : राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत असल्याने टीईटीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आत्तापर्यंत सुमारे दीड हजार टीईटीधारकांची नोंदणी करण्यात आली असून, अजूनही नोंदणीचा ओघ सुरूच आहे.राज्यात टीईटी झालेले हजारो शिक्षक असून, हे शिक्षक नोकरीपासून वंचित आहेत. टीईटी झाल्यानंतरही त्यांना नोकरीची हमी मिळाली नसल्याने या शिक्षकांना नोकरीची प्रतीक्षा आहेच. नोकरीच्या अपेक्षेने टीईटीधारक शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले असताना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पवित्र पोर्टलमध्ये स्व-प्रमाणपत्रांची नोंदणी बंधनकारक असल्याने त्यांची धावाधावा सुरू झाली आहे. विभागीय कार्यालयातच नोंदणीची व्यवस्था असल्याने विभागातील शिक्षक नाशिकमधील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत.राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांची नोंदणी सुरू केलेली आहे. त्याअंतर्गत २१ जानेवारीपासून पवित्र पोर्टलमध्ये स्व-प्रमाणपत्राची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र यासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येण्याचे फर्मान दिल्याने चार जिल्ह्यांतील टीईटीधारकांना नाशिकमध्ये येऊन नोंदणी करावी लागत आहे. यामध्ये संपूर्ण दिवस जात असल्याने नाराजी निर्माण झाली आहे. गरजू बेरोजगारांना टीईटीधारक उसनवारी करून नाशिकमध्ये आल्याचे सांगितले जाते तर कुणी महिला तान्ह्या बाळाला घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोहचत आहेत.आतापर्यंत सुमारे १५००हून अधिक बेरोजगार शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातून स्व- प्रमाणपत्राची नोंद केली आहे. मात्र यासाठी लांबचा प्रवास करावा लागत असल्याने विभागीय पातळीवर नोंदणी न करता जिल्हा पातळीवर नोंदणीची व्यवस्था असावी, अशी मागणी या टीईटीधारकांनी केली आहे. परंतु ही नोंदणी जिल्हानिहाय ठेवली असती तर या उमेदवारांचा वेळ आणि पैसा वाचला असता. काही उमेदवार हे शनिवारपासून नाशिक शहरात आले होते. तर सोमवारी सकाळी सात वाजेपासूनच रांगेत उभे होते.जिल्हानिहाय नोंदणी व्हावीटीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला विभागीय कार्यालय म्हणून नाशिकला येऊन नोंदणी करावी लागते. विभागातून टीईटीधारक येत असल्याने गर्दी आणि परिणामी विलंबही होतो. यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांचे दोन दिवस वाया जात अससल्याने प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीNashikनाशिक