शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

स्व-प्रमाणपत्र नोंदीसाठी टीईटीधारक रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:25 IST

राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत असल्याने टीईटीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नाशिक : राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली असली तरी स्व-प्रमाणपत्रासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन नोंदणी करावी लागत असल्याने टीईटीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आत्तापर्यंत सुमारे दीड हजार टीईटीधारकांची नोंदणी करण्यात आली असून, अजूनही नोंदणीचा ओघ सुरूच आहे.राज्यात टीईटी झालेले हजारो शिक्षक असून, हे शिक्षक नोकरीपासून वंचित आहेत. टीईटी झाल्यानंतरही त्यांना नोकरीची हमी मिळाली नसल्याने या शिक्षकांना नोकरीची प्रतीक्षा आहेच. नोकरीच्या अपेक्षेने टीईटीधारक शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले असताना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पवित्र पोर्टलमध्ये स्व-प्रमाणपत्रांची नोंदणी बंधनकारक असल्याने त्यांची धावाधावा सुरू झाली आहे. विभागीय कार्यालयातच नोंदणीची व्यवस्था असल्याने विभागातील शिक्षक नाशिकमधील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत.राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार शिक्षकांची नोंदणी सुरू केलेली आहे. त्याअंतर्गत २१ जानेवारीपासून पवित्र पोर्टलमध्ये स्व-प्रमाणपत्राची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र यासाठी प्रत्येकाला शिक्षण उपसंचालक कार्यालयात येण्याचे फर्मान दिल्याने चार जिल्ह्यांतील टीईटीधारकांना नाशिकमध्ये येऊन नोंदणी करावी लागत आहे. यामध्ये संपूर्ण दिवस जात असल्याने नाराजी निर्माण झाली आहे. गरजू बेरोजगारांना टीईटीधारक उसनवारी करून नाशिकमध्ये आल्याचे सांगितले जाते तर कुणी महिला तान्ह्या बाळाला घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालयात पोहचत आहेत.आतापर्यंत सुमारे १५००हून अधिक बेरोजगार शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातून स्व- प्रमाणपत्राची नोंद केली आहे. मात्र यासाठी लांबचा प्रवास करावा लागत असल्याने विभागीय पातळीवर नोंदणी न करता जिल्हा पातळीवर नोंदणीची व्यवस्था असावी, अशी मागणी या टीईटीधारकांनी केली आहे. परंतु ही नोंदणी जिल्हानिहाय ठेवली असती तर या उमेदवारांचा वेळ आणि पैसा वाचला असता. काही उमेदवार हे शनिवारपासून नाशिक शहरात आले होते. तर सोमवारी सकाळी सात वाजेपासूनच रांगेत उभे होते.जिल्हानिहाय नोंदणी व्हावीटीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला विभागीय कार्यालय म्हणून नाशिकला येऊन नोंदणी करावी लागते. विभागातून टीईटीधारक येत असल्याने गर्दी आणि परिणामी विलंबही होतो. यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांचे दोन दिवस वाया जात अससल्याने प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीNashikनाशिक