शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

डाटा आॅपरेटर ठेकेदारांचे आयोगाकडे थकले वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:21 IST

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामे करून घेतली जात असताना प्रत्यक्ष आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाइन काम करणाºया राज्यातील हजारो डाटा एंट्री आॅपरेटर ठेकेदारांना मात्र त्यांच्या वेतनाचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामे करून घेतली जात असताना प्रत्यक्ष आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाइन काम करणाºया राज्यातील हजारो डाटा एंट्री आॅपरेटर ठेकेदारांना मात्र त्यांच्या वेतनाचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. राज्य सरकारकडे निधीची मागणी करूनही ती मिळत नसल्याचे कारण आयोगाकडून दिले जात असल्यामुळे यंदाची दिवाळी या कर्मचाºयांना पगाराविनाच साजरी करावी लागण्याची चिन्हे आहेत.  मतदार पुनरीक्षण मोहिमेत दररोज किती कामे झाली याची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले, त्याचबरोबर दर दोन, चार दिवसांआड मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांच्याकडून प्रत्येक जिल्ह्णाचा व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आढावा घेतला जात असल्यामुळे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाºयांवर या कामाचा प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. बीएलओंकडून गोळा केलेले मतदार अर्ज आॅनलाइन सबमिट करण्यासाठी प्रसंगी डाटा आॅपरेटरची संख्या वाढवा, असा सल्लाही दिला जात आहे. राज्यात निवडणूक आयोगाचे आॅनलाइन काम करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णात ठेकेदार नेमण्यात आले आहेत. या ठेकेदारांकरवी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरमहा एक ते दहा तारखेच्या आत या कर्मचाºयांना वेतन देणे अपेक्षित आहे. परंतु डाटा एंट्री करण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराला निवडणूक आयोगाकडूनच दर महिन्याला केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याने तो कर्मचाºयांना देण्यास विलंब करीत आहे. दररोज चौदा ते सोळा तास हे कर्मचारी काम करीत असून, तरीही त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे तीन ते चार महिन्यांपासून त्यांना वेतनच दिले गेले नसल्याने काही जिल्ह्णांमध्ये कर्मचाºयांनी काम सोडणे पसंत केले तर जे सध्या काम करीत आहेत, त्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे.मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील ठेकेदारांचे फेब्रुवारी ते मार्च त्याचबरोबरच जुलै ते सप्टेंबर असे पाच ते सहा महिन्यांचे वेतनच आयोगाने अदा केलेले नाही. मतदार पुनरीक्षण मोहीम ३१ आॅक्टोबरअखेर असून, वेळेत काम पूर्ण करून घेण्यासाठी निवडणूक अधिकाºयांकडून डाटा एंट्री करणाºया कर्मचाºयांना तगादा लावला जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकonlineऑनलाइन