शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा ९०० हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:26 IST

नांदगाव : खरीप हंगामात अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी रब्बीच्या हंगामात झालेले नुकसान भरून काढण्याच्या नव्या उमेदीने कामाला लागला. मेहनतीने चार मिहन्यात शेतात नवे पिक उभे केले आणि अचानक आलेल्या पावसाने त्याचे स्वप्न जमीनदोस्त केले.

नांदगाव : खरीप हंगामात अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी रब्बीच्या हंगामात झालेले नुकसान भरून काढण्याच्या नव्या उमेदीने कामाला लागला. मेहनतीने चार मिहन्यात शेतात नवे पिक उभे केले आणि अचानक आलेल्या पावसाने त्याचे स्वप्न जमीनदोस्त केले. प्राथमिक अंदाजानुसार ९०० हेक्टर खेत्रातील सुमारे दीड कोटीचे पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आमदार सुहास कांदे यांच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग पंचनामे पूर्ण करण्याच्या तयारीला लागला आहे. दोन दिवसात नुकसानीचा अहवाल तयार करू असे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले. पंचनाम्याविषयी कोणतीही अडचण आल्यास शेतकर्यांनी आमदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे यांनी केले आहे. माजी तालुका प्रमुख संतोष गुप्ता, जिल्हा मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड, पंचायत समतिीचे माजी सभापती सुधीर देशमुख, राजाभाऊ जगताप, सागर हिरे आदी कार्यकर्ते शेतकर्याच्या पंचनामी व इतर अडीअडचणीसाठी कार्यरत आहेत.न्यायडोंगरी ते जातेगावचे वीज उपकेंद्र दरम्यान परधाडी घाटात विजेचे चार खांब वादळात पडल्याने जातेगावचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. जातेगाव उपकेंद्रातून १३ गावे व वाड्या वस्त्या यांना वीज पुरवठा होत असतो.

टॅग्स :Nashikनाशिक